शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

दहा तास अनुभवला मृत्यूचा थरार वाटले संपले सारे; पण धीर ठेवला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 5:00 AM

युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; परंतु २४ तारखेला होस्टेलपासून पाच किमी अंतरावरील केमिकल फॅक्टरीवर बॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर सर्व विमानतळे बंद करण्यात आली.

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युक्रेनची सीमा पार करून रोमानियात प्रवेश करण्याचे तब्बल दहा तास हा काळ मृत्यूचा थरार होता. सीमेवर एकच गर्दी, अनेक देशांतील नागरिकांचा गोंधळ, उणे सात अंश तापमान, बसायलाही जागा नाही, खायला, प्यायला काहीच नाही. एकमेकांच्या अंगावर बसलो. त्यातच गोंधळामुळे गोळीबारही झाला, काही जण जखमी झाले. क्षणभर वाटले, संपले सारे. एकमेकांना धीर दिला. देवाची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या प्रेमामुळे सुखरूप परतल्याची आपबीती युक्रेनवरून जिल्ह्यात परतलेल्या स्वराज पुंड याने ‘लोकमत’ला सांगितली. युक्रेनच्या व्हिनितसिया नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी (व्हीएनएमयू) मध्ये स्वराज शिक्षण घेत आहे. हे शहर युक्रेनची राजधानी कीव्हपासून सुमारे ५०० किमी अंतरावर आहे. युक्रेनमधून २४ ला पहिले विमान भारतीयांच्या सुटकेसाठी उडाले. आम्ही राहतो ते होस्टेल तसे सेफ; परंतु २४ तारखेला होस्टेलपासून पाच किमी अंतरावरील केमिकल फॅक्टरीवर बॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर सर्व विमानतळे बंद करण्यात आली. आमच्या इमारतीखाली तात्पुरते बंकर तयार करण्यात आले होते. त्यामध्ये आम्ही २६ पर्यंत राहिलो. खाण्या-पिण्याची फारशी सुविधा नव्हती. आमच्या जवळ जे काही होते, त्यावरच दोन दिवस काढल्याचे स्वराज याने सांगितले.आम्ही दहा जणांनी मिळून बस केली व रोमानिया सीमेच्या आठ किमी अलीकडे उतरलो. तेथून पुढे पायवाटेने जावे लागले. वरून बर्फवृष्टी सुरू होती. जमिनीवरही बर्फ होता. अशा परिस्थितीत एकमेकांना धीर देत युक्रेनची सीमा गाठली व या दहा तासांच्या जीवघेण्या अनुभवानंतर रोमानियात सेफ झाल्याचे स्वराज म्हणाला.

सीमापारसाठी दहा जणांनी शेअर केली बसयुक्रेनमधून रोमानियाच्या सीमेवर जाण्यासाठी दूतावासाचे सहकार्य मिळाले नाही. दहा जणांनी मिळून बस भाड्याने घेतली. आठ तासांचा बस प्रवास व सहा तास पायी चालून आम्ही रोमानिया सीमेवर पोहोचलो. तिथे आधीच गर्दी असल्याने सीमापार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, असे स्वराज म्हणाला.

सीमेवर गोळीबार, नायजेरियन जखमीयुक्रेनच्या सीमेवर आफ्रिकन देशाचे अनेक नागरिक होते. त्यांच्यात सीमापार करण्यासाठी गोंधळ झाला. त्यामुळे हवेत गोळीबार करण्यात आला.  यामध्ये नायजेरियन तरुणाच्या पायाला गोळी लागली, तिथे पळापळही झाली. मी मागे फिरलो अन् ग्रुप विस्कळीत झाला. या गोंधळात अनेकांचे सामान फुटले, तुटले, कपडे फाडल्याचे त्याने सांगितले.

तीन प्रसंगी वाटले - वाचणार नाहीआठ दिवसांच्या काळात ज्यावेळी शहरावर अटॅक झाला, त्यानंतर बंकरमध्ये राहावे लागले व बाॅर्डर पार करण्याच्या वेळी गोळीबार, पळापळ या तीन प्रसंगी मी रडलो. कदाचित आपण वाचणार नाही, असे वाटले. संकटातून निघण्याची मानसिकता केली व आता घरी पोहोचल्याचे स्वराज म्हणाला.

ट्रांझिट व्हिसा पहिल्यास प्राधान्य

- रोमानियात आम्हाला ट्रांझिट व्हिसा देण्यात आला. येथे स्थानिक एनजीओंनी कॅम्प लावले होते. तिथे चांगली व्यवस्था झाली, ‘ऑपरेशन गंगा’सुरु झाल्याने भारताचे विमान आले. त्यामध्ये जे अगोदर पोहोचले त्यांना प्रवेश देण्यात आला. 

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी