शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

'ई-केवायसी'मुळे थांबला ८४ हजार शेतकऱ्यांचा लाभ विभागीय आयुक्तांनी प्रक्रिया करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 13:47 IST

Amravati : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शासनस्तरावरून अनुदान देण्यात येते. यासाठी बँक खाते आधार लिंक व ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यात किमान ८४ हजार शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही. या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आढावा घेत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे व त्यांना प्रलंबित लाभ देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात येते. परंतु, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे ई- केवायसीमुळे प्रलंबित राहिलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई- केवायसी लवकर करून नुकसानभरपाई उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी संबंधितांना दिले आहे. शासनाची मदत ही संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी बँक खाते क्रमांक, ग्राहक क्रमांक व आधार लिंक करणे आवश्यक असते. या बाबी पूर्ण केल्यावर सानुग्रह अनुदानाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

जिल्ह्यात ६३.६१ कोटींची रक्कम पेंडिंगपिकांच्या नुकसानीसाठी ५,३७,४३३ शेतकऱ्यांना शासन अनुदान मंजूर झालेले आहे. यापैकी ४,२९,१५७ शेतकऱ्यांना ४४६.४९ कोटींचा लाभ मिळाला. अद्याप ८४,९७० शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसल्याने ६३.६१ कोटींचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याशिवाय २३,३०६ खात्यांना लाभ नाकारण्यात आलेला आहे.

विभागात २.६४ लाख शेतकरी प्रतीक्षेतविभागातील २,६४,६२१ लाभार्थ्यांची ई केवायसी प्रलंबित असल्याने नुकसानभरपाईची रक्कम जमा झालेली नाही. आतापर्यंत २३,३५,४८४ लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे २१० कोटी जमा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ई-केवायसीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरी