शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

परतवाड्यात लग्नाचा करारनामा; वर-वधूने लग्नमंडपी केली करारनाम्यावर स्वाक्षरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 12:54 IST

साक्षीदारही उपस्थित; नात्यातील गोडवा जपण्याचा हा प्रयत्न चर्चेत

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : विवाहप्रसंगी लग्नमंडपी वर-वधूने परतवाड्यात लग्नाच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करून नात्यातला गोडवा जपण्याची हमीच पाहुणे मंडळींना दिली.

आमच्यात वादविवाद झाले तरी आमचे आम्हीच ते एक दिवसात मिटवू, अशी ग्वाही वर-वधूने या करारनाम्यात दिली आहे. मी शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही. वराचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल, असे वधूने करारनाम्यात मान्य केले. दुसरीकडे वधूचे म्हणणे नेहमी बरोबरच असेल. मी हिची आणि आई-वडिलांची सेवा करेल, असे वराने मान्य केले आहे.

अचलपूर येथील दीपक रामभाऊ काशीकर यांची कन्या कस्तुरी आणि अमरावती येथील नारायणराव शंकरराव बाराहाते यांचा मुलगा पीयूष यांचा विवाह १३ मार्च रोजी परतवाडा-अमरावती मार्गातील मंगल कार्यालयात झाला. या विवाह सोहळ्यात लग्नमंडपी हा करारनामा दर्शनी भागात बघायला मिळाला.

अचलपूरच्या इतिहासातील हा असा पहिलाच करारनामा ठरला आहे. दोन्ही पक्षाकडील पाहुणे मंडळींकरिता तो लक्षवेधक ठरला. या करारावर कस्तुरी आणि पीयूष या दोघांनीही पाहुणे मंडळींच्या साक्षीने स्वाक्षऱ्या केल्यात. साक्षीदारही याप्रसंगी हजर झाले आणि नात्यातील गोडवा जपण्याचा हा प्रयत्न चर्चेत आला.

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्नAmravatiअमरावती