शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

विद्यापीठातील ‘त्या’ जमिनीचे प्रकरण जाणार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 15:07 IST

सिनेट सभेत निर्णय : राज्यपालांना तक्रार पाठविणार

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या कुंपण भिंतीला लागून असलेली सुमारे ८०० कोटी (आताचे बाजारमूल्य) रुपयांची जमीन गमावल्यावरून सिनेट बैठकीत बुधवारी जोरदार रणकंदन झाले. या प्रकरणात विद्यापीठातर्फे केली गेलेली कृती संशयास्पद असल्याने चौकशी समितीच्या शिफारसीनुसार ‘एसीबी’कडे जावे, असे काही सदस्यांचे म्हणणे होते. तर तसे करण्याची काहीच गरज नाही, असा अनेकांचा सूर होता.

या मुद्द्यावर प्रचंड रणकंदन झाले. शेवटी मतदान घेण्यात आले. २१ जणांनी ‘एसीबी’कडे जाण्याची गरज नाही, या बाजूने मतदान केले. तर उर्वरित दहा जणांनी एसीबीकडे जावे, या बाजूने कौल दिला. एसीबीकडे जावे, असा कौल देणाऱ्या १० सदस्यांमध्ये बहुतेक राज्यपालनामित सदस्य असल्याने आता हा मुद्दा आम्ही राज्यपालांच्या दालनात घेऊन जाऊ, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला सीट क्रमांक १०३/३ व १०३/४ मध्ये सात एकर जागा आहे. विद्यापीठ स्थापनेच्यावेळी जेव्हा जमीन अधिग्रहणाचा मुद्दा पुढे आला, तेव्हा मौजे म्हसला आणि वडाळी येथील २३३.१९ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय झाला. त्यानुसार जाहिरनामा प्रसिद्ध करून त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या. या काळात चंद्रमा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी आणि श्री गणेश ट्रेडिंग कंपनी यांनी महसूल मंत्री यांच्याकडे हरकत दाखल केली. त्यावरील सुनावणीअंती ती जागा नंतर वगळण्यात आली. तसे अतिरिक्त पत्रही विद्यापीठाला पाठविण्यात आले होते. परंतु ही बाब योग्य नसून ती जागा विद्यापीठालाच मिळण्यात यावी, यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. के. जी. देशमुख यांनी त्या सात एकर जागेची मागणी नोंदविली.

पुढे हे प्रकरण न्यायालयीन लढाईअंतर्गत सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने ही बाब स्थानिक न्यायालयात दाखल करा, असे निर्देश दिले. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा स्थानिक न्यायालयात दावा दाखल केला. परंतु एका विशिष्ट समयी तो अचानक मागे घेण्यात आल्याबाबत संशय बळावल्याची भावना सिनेट सदस्यांची होती.

टॅग्स :universityविद्यापीठAmravatiअमरावती