शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

बियाणे, खतांचे ‘दाम’ पाच वर्षांत दुप्पट; शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 7:45 AM

Amravati News पाच वर्षांत दुप्पट दरवाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला व याची झळ बसल्याने नियोजन करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

ठळक मुद्देउत्पादन खर्च वाढला, कशी करणार तजवीज?

गजानन मोहोड

अमरावती : इंधन दरवाढीने मशागतींसह पेरणीचा खर्च वाढला असतानाच बियाणे व खतांच्या दरातही वाढ झाली आहे. पाच वर्षांत दुप्पट दरवाढीमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला व याची झळ बसल्याने नियोजन करताना शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

विभागात कापूस व सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत. यामध्ये सोयाबीनचे १४.५९ लाख व कपाशीचे १०.७५ लाख हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यात सध्या सोयाबीन व कपाशीला मिळत असलेला उच्चांकी भाव लक्षात घेता, किमान ५० हजार हेक्टरमध्ये या पिकांची क्षेत्रवाढ होण्याचा अंदाज आहे.

यंदा मृग नक्षत्राला ८ जून रोजी सुरुवात झाली. मान्सूनची गती मंदावल्याने अजून पाच ते सहा दिवस पाऊस येण्याची शक्यता नाही. मात्र, हंगामापूर्वीच कंपन्यांनी बियाणे व खतांच्या दरात वाढ केली आहे. तसे पाहता पाच वर्षांत कृषी निविष्ठांच्या दरात जवळपास दुपटीनेच वाढ झालेली आहे. पाच वर्षांपूर्वी १,७०० रुपये प्रतिबॅग असणारे सोयाबीन बियाणे यंदा ३,२०० ते ३,५०० रुपयांवर पोहोचले आहे. कापसाचे ४५० ग्रॅमचे ‘बीजी-२’चे पाकीट गतवर्षी ७६७ रुपयांना होते, तेच पाकीट यंदा ८१० रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय युरिया वगळता सर्वच रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

सोयाबीन बियाणे दरातही दुपटीने वाढ

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये सोयाबीनच्या ‘जे. एस. ९३०५’ वाणाची ३० किलोची बॅग १,९५० रुपयांना होती. २०१९ मध्ये १,८५० रुपये, सन २०२० मध्ये २,२५० रुपये, सन २०२१ मध्ये २,५५० रुपये व यंदा ३,५०० रुपये असा दर आहे. याशिवाय कपाशीचे ‘बीजी-२’चे ४५० ग्रॅमचे पाकीट गतवर्षी ७६७ रुपयांना होते, ते यंदा ८१० रुपयांना आहे.

टॅग्स :agricultureशेती