शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

जिल्ह्यातील ७७६ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या; २१ कोटींचा आराखडा मंजूर

By जितेंद्र दखने | Updated: January 27, 2024 22:30 IST

२१.१८ कोटींच्या आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे.

अमरावती : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ७७६ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. या संभाव्य पाणीटंचाईच्या निवारणार्थ जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २१ कोटी १८ लाख ४८ हजार रुपयांचा आराखडा पाणीपुरवठा विभागाने तयार केला होता. हा आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २३ जानेवारी रोजी टंचाई आराखडा मंजूर केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७७६ गावांत विविध प्रकारच्या एकूण १०३३ योजना प्रस्तावित केल्या आहेत. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा करण्याच्या उपाययोजना, आराखडे तयार केले आहेत. यामध्ये ३३६ गावांमध्ये पाणीपुरवठा ४४६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २६ गावांना टँकर प्रस्तावित केले आहेत. गतवर्षी अल्प पाऊस पडल्याने यंदा नळ पाणीपुरवठा योजनांची आणि विंधनविहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी तरतूद करण्याची पाणीटंचाई कृती आराखड्यातील योजना येत्या जून महिन्यापर्यंत राबविल्या जाणार आहेत.

प्रस्तावित कामे व नियोजनएकूण उपाययोजना -१०३३एकूण गावे -७७६अपेक्षित खर्च -२१ कोटी १८ लाख ४६ हजारविहीर अधिग्रहण -४४६प्रस्तावित टँकर -२६विंधन विहीर, कूपनलिका -३३६

जिल्ह्यात २६ गावांना टँकरने पाणीपुरवठाजिल्ह्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस पडल्याने जलसाठा मुबलक समाधानकारक असला तरी त्यात २६ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांतील लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून भर दिला जात आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २६ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तविली आहे.

कृती आराखडा तालुकानिहाय गावेअमरावती ६६, नांदगाव खंडेश्वर ७७, भातकुली ३८, तिवसा ४२, मोर्शी ६५, वरुड ८०, चांदूर रेल्वे ७६, धामणगाव रेल्वे ५३, अचलपूर ३४, चांदूर बाजार ४२, अंजनगाव सुर्जी २१, दर्यापूर ००, धारणी ८२, चिखलदरा १००, एकूण ७७६.

जिल्ह्यात यंदा उन्हाळ्याच्या दिवसात भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने २१.१८ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला. सदर आराखडा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. टंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळालेली आहे. -सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प.

टॅग्स :water shortageपाणीकपात