शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

संप मिटला, दोन महिन्यांनी अंगणवाडीत झाला किलबिलाट

By जितेंद्र दखने | Updated: January 27, 2024 20:54 IST

५२ दिवसानंतर तिढा सुटला:पोषण आहाराचे वाटप सुरळीत.

अमरावती: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी उभारलेला संप मिटला असून जिल्ह्यातील सर्व ५२ दिवसानंतर अंगणवाडी सेविका आणि मदतनिस कामावर शनिवारपासून कामावर परतल्या आहेत. त्यामुळे अडीच हजारावर अंगणवाडी केंद्र उघडले असून अंगणवाडी केंद्राची मुले आलेले असून त्यांना आहार वाटप करण्यात आलेला आहे त्यामुळे अंगणवाडी केंद्रात पुन्हा किलबिलिट सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी ४ डिसेंबरपासून शासकीय सेवेत कायम करण्यासाठी मानधनवाढीच्या मागण्यासाठी संप पुकारला होता. या आंदोलनात जिल्ह्यातील २६४६ अंगणवाडीतील कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील या सर्व अंगणवाड्या बंद होत्या. अखेर ५२ दिवसांनंतर गुरुवार २५ जानेवारी रोजी मुंबई येथे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थित पार पडलेल्या या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युईटीबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय तसेच नवीन मोबाईल देण्याची मागण्या मान्य करण्यात आला. तर मानधनवाढीसंदर्भात पुढे चर्चा करण्यात येणार आहे.दरम्यान यावर अंगणवाडी कर्मचारी संघटनाचे समाधान झाल्याने तूर्तास कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे महाराष्ट्र अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक)चे जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका,मदतनिसाच्या संपाकऱ्यांच्या मागण्यावर तोडगा निघाल्याने शनिवारपासून जिल्ह्यातील २ हजार ६४६ अंगणवाड्याचे टाळे उघडले आहेत.परिणामी जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी केंद्रात चिमुकल्याचा ५२ दिवसानंतर किलबिलाट सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

आता चिमुकल्यांना नियमित पोषण आहारअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तब्बल ५२ दिवस चालले. त्यामुळे एवढे दिवस अंगणवाड्या बंद असल्याने चिमुकल्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागले होते. मात्र आंदोलन मागे झाल्याने शनिवारपासून चिमुकल्यांना नियमित पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासन सुरुवातीपासूनच अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बाबत सकारात्मक होते. संप बरेच दिवस सुरू होता. परंतु आता अंगणवाडी सेविकांचा संप मिटल्यामुळे अंगणवाडी केंद्र पूर्ववत सुरू झाल्या आहेत-डॉ.कैलास घोडके उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती