शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

१,२९१ गावांत पेटणार पाणी; प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 1:29 PM

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील.

ठळक मुद्देपाणीटंचाई निवारणार्थ सरकारकडून २,६२३ उपाययोजनांची मात्रा

अमरावती : उन्हाळ्याच्या झळा लागताच जलस्रोत कोरडे पडत असल्याने पश्चिम विदर्भातील १,२९१ गावांमध्ये एप्रिलपश्चात पाणी पेटणार असल्याची चिन्हे आहेत. प्रस्तावित उपाययोजनांच्या दिरंगाईने दाहकतेत भर पडली आहे. सध्या ३७.८५ कोटी रुपयांच्या २,६२३ उपाययोजनांची मात्रा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने योजली आहे. यामध्ये नळ योजनांसह टँकरची कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

पाणीटंचाईची तीव्रता मार्चनंतर वाढत जाते. किंबहुना दरवर्षी १०० वर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यातुलनेत यंदा भूजल स्तर खालावला नसल्याने टँकरची संख्या कमी राहील. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले आहे. काही भागात याचे सुखद परिणाम दिसत आहेत.

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील १४३ गावांमध्ये २६५ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ३३ टँकर, १६५ नळयोजनांची विशेष दुरुस्ती, १४९ नवीन विंधन विहीर व १८ तात्पुरत्या नळयोजना तयार करण्यात येणार आहे. यावर १२.६० कोटींचा निधी खर्च होईल. अकोला जिल्ह्यातील १७९ गावांमध्ये १४० खासगी विहिरींचे अधिग्रहण, सहा नळयोजनांची दुरुस्ती, ३६ विंधन विहिरी व तात्पुरत्या पूरक पाच नळयोजना तयार करण्यात येणार आहे. या १८८ उपाययोजनांवर १.९४ कोटींंचा निधी खर्च होणार आहे.

या आहेत उपाययोजना

पाणीटंचाईसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३९९ गावांमध्ये चार विहिरी खोल करणे. ३४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण, ४० टँकरद्वारे पाणीपुरवठा व ९२ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. अशा ४९८ उपाययोजनांवर ३.३१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यात टंचाईग्रस्त २९६ गावांमध्ये २७८ खासगी विहिरींचे अधिग्रहण, २९ टँकर अशा एकूण ३०७ उपाययोजनांवर २.१६५ कोटींचा निधी अपेक्षित आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील २७४ गावांत २०१ विहिरींचे अधिग्रहण, १३ टँकर अशा एकूण २४५ उपाययोजनांवर १.५६ कोटींचा खर्च होईल.

जलप्रकल्पात ५० टक्क्यांवर उपयुक्त साठा

सद्यस्थितीत प्रमुख प्रकल्पांमध्ये अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५४.९७ टक्के, यवतमाळातील पूसमध्ये ४२.४० टक्के, अरुणावती ३८.०८, बेंबळा ५७.३०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४४.२७ टक्के, वान ५३.६२ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ४०.०८ टक्के, पेनटाकळी ५४.०६ टक्के, खडकपूर्णा प्रकल्पात २३.१९ टक्के जलसाठा आहे. याशिवाय मध्यम प्रकल्पातही ५० ते ६० टक्क्यांदरम्यान जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपातGovernmentसरकारVidarbhaविदर्भ