शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

१२८ बदलीपात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होतील बदल्या; अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले एकाच जिल्ह्यात

By गणेश वासनिक | Updated: April 21, 2024 13:18 IST

एकाच जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या; आरएफओंच्या मंत्रालयात येरझारा

अमरावती : राज्यातील बदली पात्र १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलींचे सूत्र मंत्रालयातून हलणार असल्याने अनेक वनाधिकारी मंत्रालयात फिल्डिंग लावताना दिसत आहे. एकाच वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय बदल्याची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे ठाण मांडून बसलेल्यांना यावेळेस मात्र बाहेर पडावे लागेल, असे एकंदरीत चित्र आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारी वनमंत्रालयाने स्वत:कडे घेतलेले आहेत. यामुळे मुख्य वनसंरक्षकांचे बदलींचे अधिकार संपुष्टात आले असून लागेबांधे ठेवत जिल्ह्यात राहणाऱ्या काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गोची झालेली आहे. शासन निर्णयानुसार यापुढे सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन्यजीव, कार्य आयोजना असा बदली प्रवास करावा लागेल. शिवाय तीन वर्षांच्यावर एकाच ठिकाणी थांबता येणार नाही, कारण आरएफओंचे पद हे राज्यस्तरीय असल्यामुळे बदल्यांचा निकष राज्यस्तरीय लावण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्हा बदल होणार आता या निर्णयावरून स्पष्ट झालेले आहेत. कारण महाराष्ट्रातील निवडणूक संपल्यानंतर प्रशासकीय धोरणात शिथिलता येऊन ३१ मे पर्यंत राज्यातील १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा पोळा फुटणार हे निश्चित झाले आहे.

मंत्रालयात जोरदार फिल्डिंग१२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली यादी १५ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर अनेक वनाधिकारी मार्च एंडींगनंतर सक्रिय झालेले आहे. मंत्रालयात सध्या वनसचिव उत्तराखंडमध्ये प्रशिक्षणावर असून ते २९ एप्रिलपासून मंत्रालयात विराजमान होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील काही आरएफओ आपापल्या परीने भेटीगाठी कोणी जागा मिळवायची ही सोय तयारी करण्याठी मंत्रालय गाठत आहेत. राज्यातील ७५ च्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी मंत्रालयाच्या पायरीचे दर्शन करून परतल्याची माहिती आहे.

एकाच जागी ठाण मांडून बसलेतगेल्या ४ वर्षांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या वनप्रशासनाकडे आलेल्या आहेत. मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या वनाधिकाऱ्याशी लागेबांधे असणारे आरएफओ जिल्ह्यात अर्धी अधिक नोकरी करत आहेत. कधी सामाजिक वनीकरणनंतर प्रादेशिक असा बदली प्रवास सध्या सुरू आहेत. जिल्ह्यात राहण्याकरिता लक्ष्मी दर्शन दाखविण्याची प्रथा असल्याने १२८ च्या बदली यादीत १०० च्या जवळ वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग ३ प्रमाणे बदल्या करताना दिसून येतात. बनावट कारणे आणि लाखो रुपयांची उलाढाल यामुळे अनेकांना जिल्ह्यात राहतात येते अशी स्थिती आरएफओंच्या बदल्यांमध्ये यास आता मात्र ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Transferबदली