शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'त्या' नऊ गोचीडांमुळे मातोश्रीवर आली ही वेळ; संदिपान भुमरे यांची टीका

By गणेश वासनिक | Updated: September 25, 2022 19:27 IST

संदिपान भुमरे हे गत दोन दिवस अमरावती जिल्ह्यच्या दौऱ्यावर होते.

अमरावती : बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठी बांधली आणि शिवसेना उभी झाली. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा फॉर्म्युला मोडीत काढत ‘त्या’ नऊ गोचीडांनी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यामुळे आज शिंदे गटाने उठाव केला, अशी टीका राज्याचे राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या यांनी केली. 

संदिपान भुमरे हे गत दोन दिवस अमरावती जिल्ह्यच्या दौऱ्यावर होते. रविवारी नागपूरकडे जाताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर बोट ठेवले. मातोश्री हे तमाम शिवसैनिकांचे आधारस्तंभ आहे. मात्र, या मातोश्रीत उद्वव ठाकरे यांच्या जवळील नऊ गोचीडांनी पुरती शिवसेना धुळीस मिळविली, असा टोला सुद्धा त्यांनी लगावला.  

भाजप आणि शिवसेना युतीतून लढले. सत्तेत बसायच्या वेळेस काही लोकांनी विचारांशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. तरी आम्ही शांत होतो. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, अजित पवार यांच्याकडे गेले की, आमच्यासाठी निधीची कमतरता असायची. आम्हाला फक्त मुख्यमंत्रीपद होते. बाकी सत्ता ही काँग्रेस-राष्ट्रवादीची होती असेही भुमरे म्हणाले. म्हणूनच मातोश्रीला ‘त्या’ गोचीडांमुळे आज हे दिवस पहावे लागत आहे. मात्र, त्यांनी हे नऊ गोचीड कोण? याबाबत नावे न सांगण्याचे टाळले. वेळ आल्यानंतर ही नावे जाहीर करू, असे  भुमरे यांनी आर्वजून सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारण