शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

तुटलेल्या जिन्यावरून वाहतूक

By admin | Published: February 25, 2017 12:12 AM

शहरातील मुख्य बाजारपेठेमधील नगरपालिका प्रशासनाच्या व्यापारी संकुलातील बुडातून पूर्णत: तुटलेल्या जिन्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक अद्यापही सुरूच आहे.

पालिकेला मिळेना दुरूस्तीचा मुहूर्त : नागरिकांचा जीव धोक्यात चांदूरबाजार : शहरातील मुख्य बाजारपेठेमधील नगरपालिका प्रशासनाच्या व्यापारी संकुलातील बुडातून पूर्णत: तुटलेल्या जिन्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक अद्यापही सुरूच आहे. जिना दुरुस्तीबाबत पालिकेला वारंवार पत्रव्यवहार करूनही कुंभकर्णी झोपेतील पालिका प्रशासन या जिन्यामुळे मोठी घटना घडल्यावरच जागे होणार काय, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकातर्फे वर्तविली जात आहे.नगरपालिकाच्या मालकीचे नेताजी चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस व्यापारी संकुलात दोन्ही माळ्यावर एकूण ७२ दुकाने आहेत त्यामुळे हे व्यापारी संकुल नेहमीच वर्दळीचे असते. आठवडी बाजाराला तर या संकुलाच्या परिसरात ग्रामीण दुकानदार मोठ्या प्रमाणात दुकाने थाटतात. या व्यापारी संकुलाचा पहिल्या माळ्यावर मोठ्या प्रमाणात सायबर कॅफे, पाठ्यपुस्तकांचे दुकान व मोबाईलची दुकाने आहेत. त्यामुळे या संकुलात दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करतात. मात्र या संकुलाच्या पहिल्या माळ्यावर ये-जा करण्याकरिता असलेला जिना गेल्या काही महिन्यांपासून बुडातून पूर्णत: सडून तुटलेला आहे. हा जिना उभारताना केवळ दोन खांबांवर पूर्ण जिना उभारण्यात आला होता. त्याकरिता लोखंडी पोल जमिनीत गाडण्यात आले.मात्र काही वर्षांतच ही दोन्ही खांब गंजून सडल्याने पूर्णत: तुटलेली आहे. आता हा जिना फक्त पहिल्या माळ्यावर असलेल्या दोन लोखंडी अँगलवर टिकून असून हा कधी कोसळणार याची मात्र निश्चिती नाही. या जिन्यावर चढताना संपूर्ण जिना हालतो. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाला माहिती दिली. याची गंभीर दखल घेत तत्कालीन मुख्याधिकारी मेघना वासनकर यांनी अभियंता करीम यांना तत्काळ दुरूस्तीचे आदेश दिले होते. मात्र अभियंत्याचा कामचुकारपणामुळे अद्यापही या तुटलेल्या जिन्याची दखल पालिका प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. या जिन्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी, नागरिक वाहतूक करतात. या तुटलेल्या जिन्यावरून या नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन वाहतूक करावी लागत आहे. हा जिना कधी कोसळणार व यामध्ये परिसरातील नागरिकांना उद्भवत असलेल्या धोक्याची वाट तर पालिका प्रशासन पाहत नाही ना, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील व्यापाऱ्यांतर्फे केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)संकुलातील हा जिना पूर्णत: तुटल्याचे पालिकेला माहिती असूनही या जिन्यावरून वाहतूक करताना जिव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. यांची तत्काळ दुरूस्ती करणे आवश्यक असून यामुळे मोठी घटना टळू शकते.- पंकज मोहोड, स्थानिक व्यापारी