शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

जिल्हा परिषदेत बदल्यांचा बिगूल वाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:11 AM

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ...

अमरावती : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत १० टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या ३१ जुलैपर्यंत व त्यानंतर १० टक्के विशेष बदल्या आयुक्तांच्या मान्यतेने १४ ऑगस्टपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाचे आदेशानुसार जिल्हा परिषद सीईओंनी झेडपीच्या गट ‘क’ आणि गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी १५ जुलै रोजी प्रशासकीय कामकाजाची कार्यसूची जाहीर केले आहे.त्यामुळे मिनीमंत्रालयात बदल्याची धूम राहणार आहे.

दरवर्षी जून पूर्वी बदल्यांची प्रक्रिया पार पडते. मात्र यावर्षी कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने काही अपवाद वगळता इतर सर्व प्रकारचे बदल यांना ३० जूनपर्यत स्थगिती दिली होती. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही बदल्या होणार नाहीत असा अंदाज असताना सामान्य प्रशासन विभागाने बदलांबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामविकास विभागाने १५ टक्के सामान्य बदल्या करण्याची परवानगी जिल्हा परिषदेला दिली आहे.त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांचे मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. १६ ते २२ जुलै पर्यत बदली प्रक्रियेसाठीची आवश्यक कारवाई केली जाणार आहे.त्यानंतर २६ जुलै पासून प्रत्यक्ष बदली प्रक्रियेचे समुपदेश होणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

बदली प्रक्रियेची कार्यसुची जाहीर

जिल्हा परिषद कर्मचारी बदलीप्रक्रीये करीता संवर्ग निहाय अंतरिम एकत्रित वास्तव्य सेवाज्येष्ठता याद्या तयार करून प्रसिध्द करणे १६ जुलै,विनंती अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १९ जुलै,अंतिम वास्तव्य सेवाज्येष्ठता यादीवर आक्षेप व सूचना मागविणे २० जुलै,आक्षेप व सूचनांचे निराकरण करून अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणे २२ जुलै या प्रमाणे बदली प्रक्रियेची कार्यसूची सीईओंनी जाहीर केली आहे.

बॉक्स

२६ ते २८ जुलै दरम्यान बदल्या ?

जिल्हा परिषदेत वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्याची कारवाई सुरू केली आहे.१६ ते २२ जुलै पर्यत बदल्यासंदर्भात प्रशासकीय कार्यवाही केली जाणार आहे. यानंतर २६ ते २८ जुलै पर्यत बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रत्यक्ष कारवाई ही समुपदेशनाव्दारे पार पडणार असल्याचे संकेत आहेत.