शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींमधून क्षयरोग हद्दपार! निकष पूर्ण ग्रामपंचायतींचा गौरव

By जितेंद्र दखने | Updated: July 17, 2024 20:41 IST

या उपक्रमात जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवड केली होती

जितेंद्र दखने, अमरावती: केंद्र सकारने येत्या २०२५ पर्यंत भारत हा क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. याचाच एक भाग म्हणून गावपातळीवर आरोग्य संस्था, उपकेंद्र, हेल्थ वेलनेस सेंटरचे कर्मचारी व अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतीच्या समन्वयातून क्षयरोग दूरीकरणासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. यानुसार या उपक्रमात जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतींची निवड केली होती. यापैकी टीबीमुक्तीचे निकष पूर्ण करणाऱ्या ४२ ग्रामपंचायतींनी उकृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे या ४२ ग्रामपंचायत क्षेत्रातून क्षयरोग हद्दपार झाला आहे.

४२ ग्रामपंचायतींनी टीबीमुक्तीचे निकष पूर्ण करीत गावे टीबीमुक्त केली आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दिलीप सौंदळे यांच्या हस्ते सोमवारी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात ४२ गावांचे सरंपच, सचिव, पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी आदींना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. क्षयरोगमुक्त भारत करण्यावर वरील ग्रामपंचायतींनी भर दिला तसाच इतरही ग्रामपंचायतींनी आपली ग्रामपंचायत टीबीमुक्त होण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर द्यावा, असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी कटीयार यांनी केले.

यावेळी सीईओ संजीता मोहपात्रा यांनी आपल्या मनोगतामध्ये क्षयमुक्त ग्रामपंचायती निर्माण करण्यासाठी गावपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, आशा स्वयंसेवका यांना निकषाप्रमाणे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मोहपात्रा यांनी केले. प्रास्ताविक डीएचओ डॉ. सुरेश असोले यांनी केले. तर आभार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी केले. कार्यक्रमाला टीएमओ, सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक, औषधाेपचार पर्यवेक्षक उपस्थित होते.

या आहेत टीबीमुक्त ग्रामपंचायती

वासणी खुर्द (अचलपूर), कठोरा गांधी, नया अकोला, (अमरावती) हयापूर, खिरगव्हाण (अंजनगाव सुर्जी), अळणगाव, अंचलवाडी, हरताळा, सायत (भातकुली) खराळा, लाखनवाडी (चांदूर बाजार) बासलापूर, सावंगी संगम (चांदूर रेल्वे), अवागढ, कोरडा, रायपूर,(चिखलदरा), कलमगव्हाण, रामगाव, शिंगणवाडी, ताेंगलाबाद (दर्यापूर), आजनगाव, आसेगाव, बोरवाघल, कसारखेड, रायपूर कसारखेड, सोनेगाव खरडा, उसळगव्हाण, वाढोणा (धामणगाव रेल्वे), धारणमहू, रंगूबेली (धारणी), दुर्गवाडा, मैवाडी, पातूर (मोर्शी), अडगाव बुर्ख, जावरा (नांदगाव खंडेश्वर), भारवाडी, बोरडा, देहाणी, दिवाणखेड (तिवसा), बाभूळखेड, बेसखेडा, इसापूर (वरुड) अशा ४२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcollectorजिल्हाधिकारी