शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
2
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
4
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
5
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
6
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
7
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
8
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
9
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
10
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
11
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
12
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
13
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
14
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
15
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
16
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
17
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
18
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

गोविंदांवर सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे

By admin | Published: September 07, 2015 12:36 AM

शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात.

पाण्याचा अपव्यय : तीन दहिहंडी स्पर्धा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादअमरावती : शहरातील तीन मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी दहिहंडी स्पर्धा पार पडल्यात. त्याकरिता सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे. एकीकडे पाण्याच्या अभावी दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर येते. दुसरीकडे धार्मिक भावनेतून पाण्याचा अपव्ययसुध्दा नागरिकांकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाणी हे मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे. थेंब थेंब तळे साचे ही म्हण प्रचलित आहे. काहीप्रसंगी जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते. अनेक वेळा उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याला इतके महत्त्व असतानाही धार्मिक भावनेतून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दरवर्षीच दिसून येतो. रविवारी शहरात गोविंदांच्या दहिहंडीची धूम सुरूझाल्यावर 'गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला'च्या गीतावर तरुण थिरकले. गोविंदाच्या अंगावर अग्निशमन विभागाकडून पाण्याचे फवारे उडविले जात होते. पाणी पुरवठ्याचे पैसे अग्निशमन विभागाकडून आकारण्यात आले आहे. मात्र, दरवर्षीच लाखो लिटर पाणी नाल्यातून वाहत जाते. अग्निशमन विभागाकडून एका दहिहंडी स्पर्धेकरिता सुमारे २५ वाहनांनी पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्या एका गाडीत तब्बल तीन हजार लिटर पाणी साठवले जाऊ शकते.अशातच शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी दहिहंडी स्पर्धा असल्यामुळे सुमारे सव्वा दोन लाख लिटर पाण्याचे फवारे गोविंदाच्या अंगावर उडविण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असतानाही प्रशासनाकडून पाणी अपव्ययाबाबत काही मर्यादा का आखल्या जात नाहीत, असा प्रश्न उद्भवत आहे, याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आता काळाची गरज असल्याचे मत निसर्गपे्रमींनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)नगरसेवकांच्या निधीतून पाणी खर्चदहीहंडी स्पर्धांत पाणीपुरवठा व्हावा याकरिता नगरसेवकांकडून अग्निशमन दलाला पत्र पाठविण्यात येते. त्यामध्ये पाणी खर्च नगरसेवकांच्या निधीतून कपात करण्यात यावे, असे नमूद केले जाते. तेव्हा अग्निशमन विभाग पाण्याच्या मागणीनुसार पाणीपुरवठा करते. सुरुवातीला एकाच टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याकरिता प्रथम तीन तासांचे चार हजार रुपये आकारण्यात येते व त्यानंतरच्या पाणीपुरवठ्यासाठी प्रतिटँकर एक हजार रुपये याप्रमाणे पैसे आकारले जाते. धार्मिक कार्यक्रमात जनभावनेचा विचार करून दरवर्षीच दहीहंडी कार्यक्रमात लाखो लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा तीन मोठ्या दहीहंडी स्पर्धांना पाणी पुरवठा करण्यात आला आहे. त्याप्रमाणे पैसेसुध्दा आकारण्यात येते. आम्ही आमचे काम पूर्ण करीत आहेत. -भरतसिंह चव्हाण, अधिक्षक