शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

नांदगावात टायफाईडची साथ

By admin | Published: March 24, 2016 12:42 AM

सकाळचा गारवा, दुपारी ऊन, अन रात्री उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.

आबालवृध्द बेजार : खासगी दवाखाने हाऊसफुल्ल, वातावरणातील बदलाचा परिणाम नांदगाव खंडेश्वर : सकाळचा गारवा, दुपारी ऊन, अन रात्री उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत टायफाईडची लागण झाली असून येथील ग्रामीण रूग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. लहान मुले देखील डायरियाने त्रस्त झाली आहेत. दूषित पाण्यामुळे हे आजार बळावत असल्याचे चित्र आहे. मागील महिन्यापासून नांदगाव शहरात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालयातील माहे फेब्रुवारीची आकडेवारी बघता दैनंदिन १७५ ते २०० रुग्णांची नोंद करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये एकाच महिन्यात तब्बल ५५०० रूग्णांवर विविध आजारांसाठी औषधोपचार करण्यात आलेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टायफाईडची लागण झाली असून आता मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्व रुग्ण नांदगाव शहरातीलच आहे. त्यामुळे संपूर्ण नांदगाव शहर आजारांच्या विळख्यात जखडल्याचे चित्र दिसून येत आहे. सद्यस्थितीत लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, जुलाब, उलट्यांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील बदल आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळेच विविध आजार बळावत असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे मत आहे. शहरातील शासकीय व खासगी रूग्णालये फुल्ल झाली आहेत. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार बळावले आहेत. तर आता टायफाईडने डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाने या बाबीची दखल घेऊन उपाययजोना करण्याची गरज वर्तविली जात आहे.