शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आंबेडकरी गझलेचा आरंभबिंदू वामनदादा कर्डक; संमेलनाध्यक्ष प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 14:03 IST

आंबेडकरी गझल संमेलनाचे थाटात उद्घाटन

अमरावती : वामनदादांची गीतरचना अभ्यासली तर बाबासाहेबांची चळवळ, वामनदादांची गीते आणि गझलरचना यांचे संमीलन झाले आहे असे दिसते. यालाच इंग्रजीत ‘फ्युजन’ असे म्हणतात. बाबासाहेबांच्या चळवळीत ऊर्जा आणि क्रांती यांचे संमीलन झाले होते. तसेच बाबासाहेबांची चळवळ आणि वामनदादांची गीत-गझलरचना यांचे संमीलन झाले आहे. आंबेडकरवादावर अधिष्ठित काव्यलेखन करणारे आणि १९३८ पासून गझललेखन करणारे वामनदादा हेच आंबेडकरी गझलेचे आरंभबिंदू असल्याचे प्रतिपादन प्रमोद वाळके यांनी रविवारी येथे केले.

अमरावती येथे आयोजित अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या आंबेडकरी गझल संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे उद्घाटक डॉ. इकबाल मिन्ने, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, प्रमुख अतिथी अशोक बुरबुरे, डॉ. सीमा मेश्राम, नंदकिशोर दामोदर आणि महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे उपस्थित होते.

पुढे बोलताना वाळके म्हणले की, भारतात धार्मिक जीवनाची पुनर्स्थापना करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक अंगांनी ते प्रयोगही करीत आहेत. या प्रयोगावर मात करण्यासाठी जसे आंबेडकरी कविता, आंबेडकरी वैचारिक लेख प्रयत्न करीत असतात तसे किंबहुना त्याहून अधिक धैर्यशील प्रयत्न आंबेडकरी गझल करीत आहे. वामनदादांच्या प्रत्येकच गीत-गझलेमध्ये आंबेडकरवादाची सर्वकल्याणकारी भूमिका दिसून येते. त्यामुळेच वामनदादांनी लिहिलेल्या गझलांना आंबेडकरवादी गझल असे मी नाव दिले आहे. ज्या गझलांमधून सर्वकल्याणाचा, शोषणमुक्तीचा विचार येत नाही ती आंबेडकरी गझल होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

संमेलनाचे उदघाटक डॉ. इकबाल मिन्ने म्हणाले, आंबेडकरवादाच्या विचारप्रवाहाने जात, धर्म, पंथ, वंश, लिंग, देश, प्रदेश, भाषा यांच्या पलीकडे जाऊन, या साऱ्या मर्यादा ओलांडून मानवाला त्याच्या दुःखापासून मुक्ती देण्याची प्रेरणा दिली आहे. त्यामुळे माणसाला दुःख आणि वेदनामुक्त करण्यासाठी आंबेडकरवाद हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे.

यावेळी अशोक बुरबुरे, आशा थोरात, महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. सीमा मेश्राम यांनीसुद्धा समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक रोशन गजभिये, संचालन विजय वानखेडे यांनी केले तर आभार राजेश गरुड यांनी मानले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकAmravatiअमरावती