शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
5
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
6
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
7
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
8
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
9
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
10
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
11
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
14
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
15
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
17
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
18
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
19
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
20
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही

वाडे भंगले, बैल खंगले, जीव झाडाले टांगले!

By admin | Published: September 12, 2015 12:13 AM

शेती उत्पादनाचा खर्च दरवर्षी वाढत आहे. मिळणारे उत्पन्न व त्यावर झालेला खर्च याचा ताळमेळ शेतात राब राबून हाडे ...

शेतकऱ्यांचा पोळा : पारंपरिक उत्सवावर नैराश्याचे सावटसंजय जेवडे नांदगाव खंडेश्वरशेती उत्पादनाचा खर्च दरवर्षी वाढत आहे. मिळणारे उत्पन्न व त्यावर झालेला खर्च याचा ताळमेळ शेतात राब राबून हाडे झिजविणाऱ्या शेतकऱ्यांना जमला नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात आला आहे. एकीकडे गावाला सोन्याचे भाव आले. कितीही काबाडकष्ट करून उभ्या आयुष्यात शेतीच्या उत्पन्नातून शिल्लक ठेवून एक एकर शेतीही शेतकऱ्याला खरेदी करणे शक्य होत नाही. उलट आहे ती शेती कमी करण्यासाठी विक्रीस काढली जाते व थोडीफार शेती विकून त्यातून येणाऱ्या पैशावर घर बांधणे व इतर व्यवहार निभवणे असे जीणे शेतकऱ्यांच्या नशिबी आले आहे. कृषिप्रधान देशात 'शेतकरी आत्महत्या' हा विषय चिंतेचा ठरला आहे. पोळा हा शेतकऱ्यांचा आनंदाचा सण. पूर्वी प्रत्येक वाड्यात चार-पांच बैलजोड्या राहायच्या. त्याच्या दिमतीसाठी गडी-माणसे राबायची. पण अलीकडे काळ झपाट्याने बदलला आहे. कित्येक नांदलेल्या सधन वाड्यात आता पुजेलाही बैल नाही, अशी स्थिती आहे. शेतीसाठी बैलजोडी पोसणे आता महागडे झाले आहे. बैलजोडीच्या संगोपनासाठी गडीमाणसे ठेवावी लागतात. पण आता शेतमजुरीचे दर वाढले आहे व आता नवीन पिढी शेती करण्यापेक्षा पानटपरीसारखे व्यवसाय करणे पसंत करतात. पण शेतीत ढोरकष्ट करण्याची मानसिकता नसल्याने शेती व्यवसाय लयास गेला आहे. पूर्वी पोळ्याच्या सणाला दोन दिवस शेतकऱ्यांच्या घरी धामधूम असायची. पहिल्या दिवशी खांद मळणी व दुसऱ्या दिवसी पोळ्याला गडीमाणसे शेतकऱ्यांच्या घरी जेवायला राहात असे. शेतकरी गडीमाणसांना नवे कपडे शिवायचे. झडीच्या मोसमात शेतीचे कामकाज चालत नसल्याने गडीमाणसे पळसाच्या मुळ्यापासून (वाक काढून) त्यापासून बैलांचे दोर, मटाटी, चवरं तयार करायचे. आता सारं काही रेडीमेड. तेही नॉयलॉनचे अशाप्रकारे काळ बदलला आहे. कित्येक शेतकऱ्यांकडे आता बैलजोडीही नाहीत. ट्रॅक्टरने व भाड्याने बैलजोड्या सांगून शेती व्यवसाय सुरू आहे. नांदगावात पूर्वी ८ पोळे भरायचे आता फक्त चारच पोळे भरतात. कृषीधन कमी झाल्याचा हा परिणाम आहे.गेल्या १५ वर्षांत कृषिमालाचे भावाच्या तुलनेत इतर वस्तूंचे दर महागाई निर्देशांकानुसार तीनपट वाढले आहे. दुसरीकडे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आंतरमशागत व तत्सम प्रक्रियेचा खर्च तीनपट वाढला आहे. प्रत्यक्षात कृषीमाल विकून मिळणारे उत्पन्न आजही जैसे थेच आहे. ग्रामीण व्यवस्थेत श्रम करणाऱ्या पिढीला प्रतिष्ठा मिळत नसून त्यांचा अनादर होतो. मुलीचे विवाह, आजार व इतर गरजा भागविण्यासाठी शेतकरी वडिलोपार्जित शेती विकत आहे. ‘गो-धन पन्नास टक्के कमी झाले आहेत. सणासाठी कित्येक वाड्यांत आता पुजेलाही बैल दिसत नाही, ही तालुक्याची शोकांतिका आहे.