शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

पूर्व विदर्भ, मराठवाड्यावर जलसंकट, व-हाडात ३८ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 4:53 PM

धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने पूर्व विदर्भ व मराठवाडा विभागाावर जलसंकट घोंगावते आहे.

- प्रदीप भाकरेअमरावती : धरणातील जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने पूर्व विदर्भ व मराठवाडा विभागाावर जलसंकट घोंगावते आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूर विभागातील ३८४ धरणांमध्ये केवळ २३.५२, तर औरंगाबाद विभागातील ९६४ धरणांमध्ये १४.८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. त्यांच्या किंचित पुढे असलेल्या अमरावती विभागातील जलसाठ्याची टक्केवारी (३८.९६) फारशी सुखावह नाही. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जानेवारीतच राज्याच्या अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकीनुसार, राज्यातील एकूण ३२६७ धरणांमध्ये १४ जानेवारी अखेरीस केवळ ४२.६९ टक्केच उपयुक्त जलसंचय आहे. गतवर्षीच्या १४ जानेवारी रोजी ती टक्केवारी ६०.५ टक्के अशी होती. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलसंकट अधिक तीव्र होण्याची दुश्चिन्हे आहेत. अमरावती विभागातील ४४६ जलप्रकल्पांमध्ये ३८.९६ टक्के, औरंगाबाद विभागातील ९६४ प्रकल्पांमध्ये केवळ १४.८ टक्के, कोकण विभागातील १७६ प्रकल्पांमध्ये ६६.४९ टक्के, नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांमध्ये २३.५२ टक्के, नाशिक विभागातील ५७१ प्रकल्पांमध्ये ४२ टक्के व पुणे विभागातील ७२६ प्रकल्पांमध्ये ५७.८३ अशा एकूण ३२६७ प्रकल्पांमध्ये एकूण ४२.६९ टक्की उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.-------------लघू प्रकल्प कोरडेराज्यातील १४१ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६.१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी हीच टक्केवारी ६५.३४ अशी होती. एकूण २५८ मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.१७ टक्के (गतवर्षी ५५.९२ टक्के), तर २८६८ लघु प्रकल्पांमध्ये केवळ २८.४७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच लघु प्रकल्पांमध्ये ४२.३३ टक्के जलसंचय होता.--------४२४७ गाव-वाड्यांत टँकरवारीराज्यातील १३०८ गावे व २९३९ वाड्यांमध्ये एकूण १५६८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ही सांख्यिकी ७ जानेवारीची असून, १४ जानेवारीपर्यंत त्यात आणखी वाढ होणार आहे. गतवर्षी केवळ १८७ गावांना १५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. टँकरची स्थिती पाहता, गतवर्षीच्या तुलनेत टँकरच्या संख्येत तब्बल दहापट वाढ नोंदविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागपूर विभागातील उपयुक्त जलसाठा २३ टक्क््यांच्या आसपास असताना येथे अद्यापही टँकर पोहोचलेले नाहीत.

टॅग्स :Waterपाणी