शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

परतवाड्यातील ‘व्हीआयपी’ रस्ता गेला चोरीला

By admin | Published: March 07, 2016 12:03 AM

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

अवैध वाहतूक, वाढते अतिक्रमण : पालिका, वाहतूक विभाग झाले आंधळे बहिरे !नरेंद्र जावरे  परतवाडासार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाकडे जाणारा ‘व्ही.आय.पी’ रस्ता अतिक्रमण आणि अवैध वाहतुकीच्या जाळ्यात चोरीला गेल्याने वाढती वाहतूक पाहता मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. धारणी मार्गावरील टपाल कार्यालयामागून सा.बां. विभागाच्या विश्रामगृहाकडे रस्ता जातो. या रस्त्यावर होलीक्रॉस मराठी शाळा असून संतोषनगर, गोपालनगर, गौलखेडा कुंभी, मल्हारा, नरसरी हे परतवाडा शहराला लागून असलेली गावे आहेत. दुसरीकडे विश्रामगृहावर सतत जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी, मंत्र्यांचे मुक्काम राहते, व्हीआयपी रस्ता म्हणून त्यांची ओळख आहे. रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. पादचाऱ्यासह दुचाकी चालकांना वाढते अतिक्रमण व अवैध वाहतुकीचा थांबा पाहता जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागत आहे. कोण करणार कारवाई ?चिखलदरा थांबा नावाने या चौकाची ओळख असून तेथूनच धारणी वजा विश्रामगृहाकडे जाणारा व्हीआयपी रस्ता आहे. अरुंद असलेल्या या रस्त्यावर हॉलीक्रॉस शाळेपर्यंत हातठेले, पानटपऱ्या, कॅन्टीन, हॉटेलचे अतिक्रमण व त्यामुळे मेळघाटसह परिसरात चालणाऱ्या अवैध प्रवासी वाहने दिवसभर रस्त्याच्या दुर्तफा उभ्या राहत आहेत. अगदी चौकात पालिकेने अ‍ॅटो थांबा दिल्याने अतिक्रमण व अवैध वाहतूक करणारे वाहने रस्ता अडवून वाहतुकीस अडथळा करताना दिसून येत आहे. दिवसभर हे चित्र वाहतूक विभाग व पालिका प्रशासनाला दिसत असताना त्यांनी आंधळे व बहिरे झाल्याचे सोंग घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. धारणीकडे जडवाहतूक करणारे ट्रक व य-जा करणारी जड वाहने दिसल्यावरसुध्दा आॅटोचालकांची मुजोरी प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणारी ठरली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह संपलावाहतुकीचा परतवाडा शहरात चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, फिन्ले मिल स्टॉप, बाजार समिती, बसस्थानक, जयस्तंभ चौक, जगदंबा चौक, चिखलदरा, अंजनगाव, बैतूल स्टॉप येथे पहावयास मिळतो. पादचाऱ्यांसह दुचाकीचालकांना जीव मुठीत घेऊन येथून चालावे लागते. याच वाहतूक विभागाने गत महिन्यांत झालेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहात संपूर्ण शहराला नियम शिकविले होते. मात्र सप्ताह संपताच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे गंभीर चित्र आहे. कुठे गेले अतिक्रमण निर्मूलन पथक ?अचलपूर नगरपालिकेत दिवाळीचे फटाके आणि गोडधोड फराळ झाल्यावर दोन अभियंत्यांची नियुक्ती करीत अतिक्रमण निर्मूलन पथक तयार केले होते. व्हीआयपी रस्त्याप्रमाणे शहरातील इतरही वर्दळीच्या रस्त्यावर अतिक्रमण वाढले. परिणामी ते अपघाताला कारणीभूत ठरणारे आहे. त्याचा फटका शाळकरी विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारा ठरणार आहे. विश्राम गृहाकडे जाणाऱ्या गाड्यांचा ताफासुध्दा या वाढलेल्या अतिक्रमण व बेशिस्त वाहतुकीला कारणीभूत ठरतेय.