शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
3
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
4
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
5
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
6
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
7
Share Market : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
8
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
9
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
10
१७० खोल्यांचं घर, ₹२०००० कोटींची संपत्ती; कोण आहेत जगातील सर्वात मोठ्या घराचे मालक समरजीतसिंह गायकवाड
11
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
12
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
13
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
14
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
15
मनसेला महायुतीचा पाठिंबा मिळण्याची चर्चा; मतांचे विभाजन होऊ नये यासाठी सारेच प्रयत्नशील
16
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
17
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
18
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
19
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
20
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

अडगावात आज गोविंदगीर महाराजांची यात्रा

By admin | Published: September 13, 2015 12:10 AM

अंजनगाव- अकोट मार्गावरील अडगाव खाडे या गावात पोळ्याच्या करीच्या दिवशी गोविंदगीर महाराजांची यात्रा भरते.

पोेळा : करीच्या दिवशीही मांसाहार वर्ज्य!अंजनगाव सुर्जी : अंजनगाव- अकोट मार्गावरील अडगाव खाडे या गावात पोळ्याच्या करीच्या दिवशी गोविंदगीर महाराजांची यात्रा भरते. पाच पिढ्यांचा वारसा असलेली ही यात्रा ऐतिहासिक आहे. त्याचप्रमाणे यात्रेतून ग्रामदैवताविषयी गावकऱ्यांची गाढ श्रध्दा प्रकट करणारीदेखील आहे. लोककथेनुसार अंदाजे पाच पिढ्यांपूर्वी वाराणसी (काशी) येथून अडगावात पोहोचलेल्या गोेविंदगीर गोसावी यांनी गावाशेजारच्या गायमुख नदीच्या तिरावर झोपडी बांधून तप साधनेत आयुष्य घालविले व तेथेच समाधी घेतली. नवनाथ परंपरेतील कानिफनाथांच्या पंढरपूर येथील आश्रमात साठीतले गोविंदगीर राहात होते. त्यावेळी त्यांना तिर्थयात्रेची ईच्छा झाली. भटकंतीदरम्यान ते प्रथम अकोट तालुक्यात आले व तेथून अडगाव खाडे येथे आले. गावातील मासूमशहा फकीर त्यांना भेटला. दोघांची गळाभेट झाली व गोविंदगिरांनी येथेच राहण्याचा निश्चय केला.गायमुख नदीच्या शेजारी दाट शिंदीच्या वनात झोपडी बांधून ते राहू लागले. काही दुष्टांनी त्यांना त्रासही दिला. पण, अनेक गावकऱ्यांना त्यांच्या कृपाप्रसादाची अनुभूती झाल्यामुळे गोविंदगीर महाराजांची कीर्ती पसरली. गावातले अनकाजी खाडे हे निपुत्रिक होते. त्यांना गोविंदगीरांनी कुबडी देऊन शेजारच्या झाडावरील आंबा पाडायला लावला. तो प्रसाद खाऊन अनकाजीला पुुत्रप्राप्ती झाली. तेव्हापासून त्यांनी या यात्रेची प्रथा सुरु केली. आपल्या हयातीत गोविंदगीरांचे अनेक चमत्कार गावकऱ्यांना अनुभवण्यास मिळाले. वरुड जऊळक्याचा नथ्थू बाभूळकर, वडाळीचा देशमुख, मुंबईची वृध्द मारवाडी महिला, तेलखेडचे सदाशिव पाटील, हातुर्ण्याचा पुंडलिक म्हाली, कापूसतळणीची सरुबाई, मांगरुळचा कुंभार, पुण्याचा ब्राह्मण आदी अनेकांना महाराजांनी व्याधीमुक्त केल्याच्या लोककथा आहेत. गावातील जुन्या पिढीतले देवराव खाडे यांना दृष्टांत देऊन महाराजांच्या समाधीचा शोध लागला. तो दिवस भाद्रपद शुध्द प्रथमेचा होता. याच दिवसापासून महाराजांची जयंती साजरी करण्याची प्रथा पडली. कालांतराने गावात मंदीर तयार झाले. यात्रेच्या दिवशी अडगाव खाडे गावात दिवाळी अवतरते. पोळ्याच्या रात्रीपासूनच जयंतीची तयारी सुरु होते. रात्रभर चाललेल्या भजनांसह एका विशेष विधीने ३० आयुर्वेदिक वनस्पतींना दगडी खलबत्यांमध्ये कुटून धुनीचे साहित्य बनविण्यात येते. या साहित्याची धुनी जयंतीच्या दिवशी मंत्रोच्चारात पेटविली जाते आणि गावात पालखीसोबत फिरविली जाते. यावेळी पाच भक्त गावाबाहेर जाऊन बारा गावांच्या वेशीची पूजा करतात. यामुळे गावावरचे संकट टळते, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे. यात्रेत दर्शनासह महाप्रसादाचा आनंद घेण्यात येतो. गोविंदगीर महाराजांवर गावकऱ्यांची एवढी श्रध्दा आहे की, करीचा दिवस असूनही अख्खे गाव मांसाहारापासून अलीप्त राहतात. आपल्या दैवताप्रती श्रध्दा प्रकट करण्याचा हा निश्चय आगळा वेगळा आणि विलक्षण आहे.