शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

१,४०० कोटींचे कर्ज होणार माफ

By admin | Published: June 25, 2017 12:01 AM

दीड लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली.

दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा : २५ हजार नियमित खातेदारांनाही लाभलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दीड लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली. याचा जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या सर्व शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेले एक हजार ३९८ कोटी ७८ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. त्याचप्रमाणे नियमित कर्जाचा भरणा करणाऱ्या २५ हजार ३१२ शेतकऱ्यांना २५ हजार रूपयांच्या मर्यादेत अनुदान मिळणार आहे. आर्थिक कोंडीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ व नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी व शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव नाही. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर कर्जाचा डोंगर झाला. मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, बँका व सावकारांच कर्ज आदीमुळे नैराश्य येऊन, जगावं कसं या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांत वाढ झाली.२५ हजारांपर्यंत अनुदानअमरावती : संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले. ठिकठिकाणी आंदोलकाचा उद्रेक झाला. अखेर शासनाने नमते घेत आंदोलकांशी चर्चा केली. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीविषयीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना जाहीर केली. त्यानुसार एक एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ पर्यंत थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील दोन लाख १२ हजार ५६५ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांचे एक हजार ३९८ कोटी ७८ लाखांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या किमान २५ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. मात्र कर्जमाफीच्या रकमेत व्याजाचा समावेश आहे किंवा नाही, याविषयी संदिग्धता आहे. दर्यापूर येथील शेतकरी बोडखे यांनी याविषयाचा शासनाने सविस्तर खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.जिल्ह्यातील दीड लाखांपर्यंतचे थकीत कर्जदारजिल्हा बँकेत ५० हजारांपर्यंत २३ हजार ८५७ शेतकरी कर्जदार आहेत. त्यांचे ९९ कोटी ३२ लाखांचे कर्ज थकीत आहे. एक लाखापर्यंत २५ हजार १३३ शेतकऱ्यांचे १२० कोटी ५४ लाख थकीत आहेत, तर दीड लाखांपर्यंत १२ हजार ८१८ शेतकऱ्यांचे ७३ कोटी एक लाख, असे एकूण ६१ हजार ३०८ शेतकऱ्यांचे २९२ कोटी ८७ लाख रुपये थकीत आहेत.राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ५० हजारांपर्यंत ८७ हजार ३६३ शेतकरी कर्जदार आहेत. त्यांचे ६४० कोटी ९४ लाखांचे कर्ज थकीत आहे. एक लाखापर्यंत ४५ हजार १८७ कर्जदार शेतकऱ्यांचे ३३१ कोटी ५२ लाख थकीत आहे, तर दीड लाखांपर्यंत १८ हजार ७५ शेतकऱ्यांचे १३२ कोटी ६१ लाख असे एकूण एक लाख ९ हजार ६२५ शेतकऱ्यांचे ११०५ कोटी सात लाख थकीत आहेत.ग्रामीण बँकांकडे ५० हजारांपर्यंत ५७५ शेतकऱ्यांचे ६ लाखांचे कर्ज थकीत आहेत. एक लाखापर्यंत ५७ शेतकऱ्यांचे २५ लाखांचे कर्ज ३० जून २०१६ पर्यंत असे एकूण ६३२ शेतकऱ्यांचे ८५ लाख थकीत आहेत.मुदतीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदानजिल्ह्यात सद्यस्थितीत २५ हजार ११२ शेतकऱ्यांनी नियमित कर्जाचा भरणा करून यंदाच्या खरिपासाठी पुन्हा कर्जाची उचल केली आहे. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार यापैकी जी रक्कम कमी आहे ती अनुदान म्हणून मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार ७ हजार १८, ग्रामीण बँकांचे १९३ व जिल्हा बँकेचे कर्जदार १७ हजार ९०१ शेतकऱ्यांना या सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.