शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

बाराखडी शिकायची ? मग तुम्हीच शाळेत जा अन् नोंदणी करा !

By जितेंद्र दखने | Updated: December 6, 2023 20:58 IST

४७ हजारांवर अंगठेबहाद्दर : बहिष्काराने साक्षरता अभियान ठप्प

अमरावती: २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात ५० हजार नव्हे, तर सुमारे  ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत. केंद्र सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या नव भारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून या निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख करून देण्यात येणार आहे. मात्र, सर्वेक्षणावरच शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे दोन वर्षांचा कालावधी होत आला तरी या अभियानाला गती आली नाही.

शिक्षक सर्वेक्षण करायला तयार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता शिक्षण संचालकांनीच "बाराखडी शिकायचंय? तर तुम्हीच शाळेत जाऊन नोंदणी करा", अशी साद नागरिकांना घातली आहे, हे विशेष. निरक्षर व्यक्तींना अक्षर ओळख व्हावी, यासाठी यापूर्वीही अनेक उपक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून अनेकांना अक्षर ओळखही झाली; मात्र १०० टक्के निरक्षर साक्षर झाले नाहीत. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ३ लाख ६२ हजार ९०६ निरक्षर आहेत.

नव भारत साक्षर अभियानाच्या माध्यमातून २०२२ व २०२३ या दोन वर्षांत ४७ हजार ५४० निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते; परंतु शिक्षकांनी निरक्षरांच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकल्यामुळे हे अभियान पुढे सरकू शकले नाही. शिक्षण विभागाकडून विविध स्तरावर प्रयत्न झाले; मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. शिक्षक आपल्या भूमिकेवरून तसूभरही सरकायला तयार नसल्याने अखेर शिक्षण संचालकांनी एक पाऊल मागे घेतले आहे. स्वतंत्र पत्र काढत आता निरक्षरांच्या नोंदणीसाठी शिक्षक त्यांच्याकडे जाणार नाहीत, तर निरक्षरांनीच शाळेत जाऊन नोंदणी करावयाची आहे. त्यामुळे आता निरक्षरांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर अभियानाचे यश अवलंबून आहे.

जिल्ह्यात निरक्षर- ३,६२,९०६दोन वर्षांत साक्षर करण्याचे उद्दिष्ट- १८२०४प्रेरकांची गरज - १८२०४दोन वर्षाचे उद्दिष्ट - ४७५४०

टॅग्स :SchoolशाळाAmravatiअमरावती