शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

'वेस्ट टू वेल्थ' : अंबानगरीत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’च्या ‘ट्रीपल आर’ची धूम!

By प्रदीप भाकरे | Published: November 19, 2022 1:34 PM

या सर्वेक्षणात रिड्युस, रिसायकल व रियुज या तीन ‘आर’ला आरलाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने पाऊल टाकणे सुरू केले आहे.

अमरावती : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अर्बन २.० अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यंदा ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ राबविले जाणार आहे. सात हजार गुणांच्या या वार्षिक परिक्षेचे मुल्यांकन जानेवारी २०२३ मध्ये होत असले, तरी त्यापुर्वी विविध तीन घटकांमध्ये उत्तम गुणांकन प्राप्त करण्यासाठी महापालिका सरसावली आहे. स्वच्छ सर्वेक्षण आठव्या आवृत्तीची थिम ‘वेस्ट टू वेल्थ' अशी आहे. या सर्वेक्षणात रिड्युस, रिसायकल व रियुज या तीन ‘आर’ला आरलाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने पाऊल टाकणे सुरू केले आहे.

अमरावती महापालिकेत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ बाबतची कार्यवाही सुरु झालेली असून उपआयुक्त तथा वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डॉ. सीमा नैताम यांच्या उपस्थितीत त्यासाठी नुकतीच सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेला सर्व जेष्ठ स्वास्थ निरीक्षक, स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते. ‘स्वच्छ सर्वेक्षण’ च्या मार्गदर्शिकेनुसार प्रामुख्याने १०० टक्के कचरा संकलन करणे, ओला-सुका कचरा वर्गीकरण करणे, घातक वस्तु/पदार्थ वेगळे संकलित करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर, उत्कृष्ठ स्वच्छता कामगार/वाहन चालक यांना सन्मानित करणे, प्लास्टिक बंदी मोहीम, बांधकाम व विध्वंसक कचरा दिसल्यास दंडात्मक कार्यवाही करणे, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे, थुंकणे याकरिता दंडात्मक कार्यवाही करणे, स्वच्छता कर्मचा-यांकरीता फिल्डवर प्रशिक्षण देण्याच्या सुचना करण्यात आल्या.

स्वच्छ सर्वेक्षणात काय?नेहमी कचरा दिसणा-या ठिकाणाचे सौंदर्यीकरण, व्यावसायिक ठिकाणी दररोज दिवसातून दोन वेळा रात्रीच्या वेळेसह साफसफाई, छत्री तलाव, वडाळी तलावची साफसफाई, सर्व प्रभागातील नाले स्वच्छ ठेवणे, सर्व बॅकलेनची स्वच्छता, प्रत्येकी चार ई-लर्निंग कोर्सेस करून घेणे, स्वच्छता अँपवरील तक्रारींचे निराकरण करून त्या तक्रारींना सकारात्मक फिडबॅक देणे या बाबींचा, उपाययोजनांचा त्यात समावेश असेल, असे निर्देश देण्यात आले. बैठकीला स्वास्थ अधिक्षक एकनाथ कुलकर्णी, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके आदींची उपस्थिती होती.

लोकसहभाग सर्वाधिक महत्वाचास्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत शहरातील कमीत कमी एक पार्क ‘वेस्ट टू वंडर पार्क’ म्हणून विकसित करणे बंधनकारक आहे. स्वच्छतेप्रती नेहमी जागरूक असणारे स्वातंत्र्य सैनिक यांना सन्मानित करणे. शहरातील नागरिकांच्या सहभागाने उद्याने, स्मारके सुस्थितीत करणे, ज्या प्रभागात निवासी संस्था, अपार्टमेंटस, नागरिक यांचेकडून शून्य कचरा गोळा करण्यात येतो तसेच ओल्या कचऱ्यापासून जागीच खतनिर्मिती करण्यात येते व वार्ड अंतर्गतच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते, अशा प्रत्येक झोनमधून एक वार्ड हा आत्मनिर्भर वार्ड म्हणून घोषित करण्यासाठी पालिकेला लोकसहभाग आवश्यक आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती