शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

बियाणे, खतांच्या विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 23, 2023 4:45 PM

खरिपाची लगबग, शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर ६२ कक्ष स्थापित.

गजानन मोहोड/अमरावती: खरीप हंगाम दीड महिन्यांवर आल्याने कृषी विभागाची लगबग सुरु झालेली आहे. हंगामासाठी कृषी निविष्ठामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याकरिता पश्चिम विदर्भात यंदा कृषी निविष्ठा विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच राहणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई होण्यासाठी तालुकास्तरावर ६२ तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी दिली.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या तयारीचा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार २८ एप्रिल रोजी पश्चिम विदर्भाचा आढावा घेणार आहे. यासाठी कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. पेरणी काळात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा वेळेत मिळाव्यात, त्यांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी गुणनियंत्रण विभागाची महत्त्वाची भूमिका असते. यासाठी १७१ गुण नियंत्रण निरीक्षक यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते वेळेत व योग्य भावाने उपलब्ध व्हावीत, यासाठी अमरावती जिल्ह्यात १५, यवतमाळ १७, अकोला ८, वाशिम ७, बुलडाणा १४ व विभागस्तरावर १ असे एकूण ६२ भरारी पथकांचे गठण करण्यात आल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी दिली. याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या एकच टोल फ्री १८०० २३३ ४००० हा क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी ५६ समित्या

पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या कृषी विषयक तक्रारी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर ५६ तक्रार निवारण समित्यांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात १४, यवतमाळ १६, अकोला ७, वाशिम ६ व बुलडाणा जिल्ह्यात १३ आहेत. याशिवाय ६२ निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापित करण्यात आल्याचे कृषी सहसंचालकानी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Amravatiअमरावती