शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

पाणीटंचाईची तीव्रता वाढली; भूजल पातळी घटल्याने १४३ गावांना कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 5:57 PM

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कृषी आराखड्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत १४३ गावांना कोरड पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयंत्रणेद्वारा उपाययोजनांची मात्रा, टँकरसाठी निविदा

अमरावती : एप्रिलनंतरच्या तिसऱ्या टप्प्यात पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. तापमानवाढ व भूजलपातळी खोल गेल्याने उंचावरील गावांचे जलस्रोत कोरडे पडले आहेत. याकरिता काही योजना व विहीर अधिग्रहणासोबतच टँकरचे नियोजन केले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पुरवठा विभागाच्या कृषी आराखड्यानुसार एप्रिल ते जून या कालावधीत १४३ गावांना कोरड पडण्याची शक्यता आहे. यासाठीचे नियोजन या विभागाद्वारे जरा उशिरानेच करण्यात आले आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात मेळघाट वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यातही ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत संततधार पाऊस, अतिवृष्टी यामुळे चांगल्या प्रमाणात भूजलाचे पुनर्भरण झालेले आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील भूजल पातळीत एक मीटरपर्यंत वाढ झाल्याने मार्चपर्यंत पाणी टंचाईचा प्रश्न उद्वलेला नाही. त्यामुळेच प्रशासनाचीदेखील दिरंगाईच झाल्याचा आारोप होत आहे.

मार्चअखेरीस काही गावांत पाणीटंचाई सुरू झाली व त्यानंतर प्रशासनाद्वारे सातत्याने विचारणा झाल्यानंतर प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे तयार करण्यात आला आहे. काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी व काही योजनांसाठी निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

१११ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी एप्रिल ते जून या कालावधीत १११ गावांमध्ये ११५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यासाठी ६२.१० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय किमान १० टँकरद्वारे दहा गावांना पाणीपुरवठा करण्याचेही नियोजन प्रशासनाने केले आहे. ३१ गावांमध्ये ३४ नवीन विंधन विहिरी व कूपनलिका तयार करण्यात येणार आहेत. या सर्व उपाययोजनांवर १.३० कोटींचा निधी खर्च होणार आहे.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातwater scarcityपाणी टंचाई