शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

आम्ही पिशवीत नेऊन खातो, ते पिशवीच खातात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 16:39 IST

Amravati : आपला निष्काळजीपणा बनला जनावरांच्या जीवाला धोका

मनीष तसरेअमरावती : भाजीपाला, फळ तसेच इतरही वस्तूसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केला जातो. परंतु उपयोगानंतर प्लास्टिक पिशवी फेकून दिल्या जात असल्याने जनावरे ही प्लास्टिक पिशवी खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे.

प्लास्टिकचे धोके काय?• प्लास्टिक म्हणजे आपल्या पृथ्वीवरचे संकटच म्हणावे लागेल. जंगल, जमीन, नद्या, महासागर प्लास्टिकच्या कचऱ्याने व्यापले आहे.• प्लास्टिकचे कित्येक वर्षे विघटनच होत नाही, त्यामुळे ते तसेच पडून राहते. त्यामुळे पाण्याचे स्रोतदेखील प्रदूषित झाले आहे.• नद्या, समुद्र या विळख्यात आहेत. पाण्याचे प्रवाह बंद झाले आहेत. जमिनीचा पोत घसरला असून, भूगर्भातील पाणी प्रदूषित झाले आहे.

प्लास्टिकचा जनावरांनाही धोकाशहरातील जनावरांसाठी प्लास्टिक मोठा धोका ठरला आहे. जवळपास ८० टक्के गायी, म्हशी अन्नासोबत प्लास्टिकदेखील खातात. पोटामधील आतडे व इतर अवयवांची हालचाल होताना त्या सोबत प्लास्टिकदेखील गुंडाळले जाते. यामुळे पचन तंत्र बिघडते, गॅसेस तयार होतात व त्यातून विषबाधा होते. तसेच रवंथ प्रक्रिया बंद पडते व त्यातून त्यांचा मृत्यू होतो. - डॉ. सागर ठोसर, पशुवैद्यकीय अधिकारी 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAmravatiअमरावती