शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढणार; समाजवादीच्या अबू आझमी यांची घोषणा

By उज्वल भालेकर | Updated: March 3, 2024 20:05 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत संविधानविरोधी पक्षांना संपवणार.

अमरावती : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये सहभागी असला तरी महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही स्वतंत्र आहोत. आमची कोणाशीही युती नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष हा धर्मनिरपेक्ष उमेदवारांच्या सोबत राहील, अशी भूमिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी रविवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केली. सध्या देशात संविधानविरोधी लोक सत्तेत आहेत. त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्रात ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ यात्रा सुरू करण्यात आली आहे. यानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी अबू आझमी अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अबू आझमी म्हणाले, देशात ७० टक्के नागरिक हे शेतकरी आहेत, देशभरातील शेतकरी आज संकटात असून महाराष्ट्रात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारकडे कोणतेही धोरण नाही. देशावरील कर्ज हे चारपटीने वाढले, तर दुसरीकडे कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योगपतींचे १० लाख कोटी सरकारने माफ केले. देशातील गरिबीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून देशात धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. लव्ह जिहादच्या नावावर हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. देशातील न्यायालयाचे निर्णयदेखील भावनिक आणि आस्थेच्या नावावर दिले जात असतील, तर या देशातील अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिमांना कधीच न्याय मिळणार नाही. त्यामुळे आम्ही द्वेषाच्या विरोधात हिंदू-मुस्लिम एकतेसाठी लढा देत आहोत आणि आगामी लोकसभा निवडणुकीतही आम्ही धर्मनिरपेक्ष उमेदवारांसोबत राहणार असल्याचे अबू आझमी म्हणाले. यावेळी त्यांनी कॉँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगत कॉँग्रेसवरही निशाणा साधला. कॉँग्रेसच्या काळात शेतकरी आत्महत्या होत होत्या. आज ते मुस्लिम आरक्षण देण्याची गोष्ट करतात. परंतु जेव्हा ते सत्तेत होते तर त्यांनी मुस्लिम आरक्षण का दिले नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जरी इंडिया आघाडीमध्ये समाजवादी पक्ष असला तरी महाराष्ट्रात स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नेत्यांनी दिल्याचेही अबू आझमी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Amravatiअमरावती