शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

धामणगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना कधी मिळणार मदतीचा आधार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:11 AM

पाच गावे उपेक्षित पान १ वर गतवर्षी उघडली बगाजी सागर धरणाची १३ दारे, अप्पर वर्धाचे अतिरिक्त पाण्याने शेतकऱ्यांचे हाल ...

पाच गावे उपेक्षित

पान १ वर

गतवर्षी उघडली बगाजी सागर धरणाची १३ दारे, अप्पर वर्धाचे अतिरिक्त पाण्याने शेतकऱ्यांचे हाल

धामणगाव रेल्वे : गतवर्षी जुलै महिन्यात बगाजी सागर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच गावांतील तब्बल अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र, अद्यापही मदतीचा आधार न मिळाल्याने या शेतकऱ्यांचा आक्रोश कायम आहे.

गतवर्षी अधिक पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. येथील पाण्याचा प्रवाह बगाजी सागर धरणात आल्याने या धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. गतवर्षी जुलै महिन्यात एकीकडे वर्धा नदीला आलेला महापूर, तर दुसरीकडे बगाजी सागर धरणाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या पात्रालगत असलेल्या नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, आष्टा, चिंचोली या परिसरातील तब्बल २५० शेतकऱ्यांची शेतजमीन जमीन खरडून गेली होती, तर पिके पूर्णत: वाहून गेली. एकट्या नायगाव येथील सर्वाधिक ४८ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने त्यावेळी सर्वेक्षण केले जिल्हा प्रशासनाला ही यादी पाठवण्यात आली होती. मात्र, या शेतकऱ्यांना एक रुपया अद्यापही मदत मिळाली नाही.

दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नशिबाला दोष

मागील आठ-दहा वर्षांपासून दरवर्षी नदीपात्रालगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान होते. परंतु, तालुका व जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच डबघाईस येत आहे. दरवर्षी उसनवारी, व्याजाने पैसे घेऊन पेरणी केल्यानंतर बगाजी सागर धरणाचे पाणी सोडले जाते. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे हे पीक नष्ट होते. अनेक वेळा तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, आता न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. दहा वर्षांपासून या भागातील शेतकरी नशिबाला दोष देत शेती करीत आहेत.

--------------

गतवर्षी उसनवारी घेऊन शेतीची पेरणी केली. मात्र, जुलैमध्ये बगाजी सागरचे दरवाजे उघडले. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण शेतच खरडून गेले. शासन व प्रशासनाने आमच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.

- राजेंद्र शेलार, नायगाव