शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

चांदुरात कुठे आहे कोरोना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 5:00 AM

आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तुफान गर्दी : संचारबंदीचे उल्लंघन, प्रशासन घायकुतीस

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी देशात २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला उपविभागीय अधिकारी यांनी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. या शिथिलतेचा गैरफायदा घेत शेकडो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याने संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मात्र, याकडे पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदार सर्रास दुकाने उघडून फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करता व्यवसाय करीत आहते, तर ग्राहकसुद्धा विनामास्कने सर्रास वावरत असून, संचारबंदीचा सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.जिल्ह्यासह राज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसला तरी शहरातील बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी पाहता पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. नागरिकसुद्धा बेजबाबदार झाल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतेपर्यंत बाजारात तुफान गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे संचारबंदी संपुष्टात आली काय, असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करीत आहे. काही व्यवसायिकांना अटी व शर्तीच्या अधीन राहून ६ मे पासून व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली. यात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गल्ली बोळीतील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेत अनेक दुकाने उघडली.संचारबंदीत अतिक्रमणहीया दुकानांवर होणाºया गर्दीमुळे संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात भरणाºया भाजीपाला दुकाने व फळाच्या गाड्या मनात येईल तेथे उभ्या करून दुकाने थाटली जात आहे. यामुळे बाजारात सगळीकडे गर्दीच गर्दी झाली असून, कोरोनाचा शिरकाव दबक्या पायाने तालुक्यात तर होणार नाही ना? अशी शंका स्थानिक नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे. काही दुकानदारांनी कमाईच्या लालसेपोटी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंग कुठेही दिसून येत नाही. पोरांना विषाणूचा संसर्ग अद्यापही टळलेला नाही. असे असतानाही शहरात होत असलेली गर्दी या जीवघेण्या विषाणूला आमंत्रण देणारी ठरत आहे. संचारबंदीचे होत असलेले उल्लंघन पाहून खरेच शासनाने सवलत देऊन चूक तर केली नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असले तरी गर्दी आटोक्यात आणणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार