शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

अमरावती विद्यापीठात कुलसचिवपदाची धुरा कोण सांभाळणार? कुलगुरूंसमोर पेच

By गणेश वासनिक | Updated: May 16, 2024 21:42 IST

कार्यभार देण्यासाठी पात्र अधिकाऱ्याचा शोध सुरू

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांचा कार्यकाळ येत्या १९ मे रोजी पूर्ण होत असून त्यांचा कार्यभार कुणाला द्यावा, यासाठी पात्र अधिकाऱ्याचा शोध कुलगुरूंनी सुरू केला आहे. गत पाच वर्षात विद्यापीठाची दुरवस्था, प्राधिकारणीसमोर उठलेले विविध प्रश्न, नॅकचा घसरलेला दर्जा, अधिसभा निवडणुकीत अनुभवहीन अधिकाऱ्यांच्या मनमानी धोरणामुळे निर्माण झालेली न्यायालयीन प्रकरणे, माजी रासेयो संचालकांचे गाजलेले अग्रीम प्रकरण अशा विविध प्रकरणांमुळे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पात्र अधिकारी /प्राध्यापकास कुलगुरूंनी स्थानापन्न कुलसचिवपदाचा कार्यभार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानापन्न नियुक्ती म्हणजे काय?

कुलसचिवांचा कार्यकाळ संपल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीकरिता चार्ज दिला जातो तेव्हा तो पूर्णकालीन कार्यभार गणला जातो आणि कुलसचिवपदाच्या वेतनाकरिताही ग्राह्य मानण्यात येतो. स्थानापन्न नियुक्ती ही पूर्णवेळ नियुक्ती गणली जात असल्याने व नियमित वेतनश्रेणी अंतर्गत येत असल्याने ही नियुक्ती देताना नियमानुसार कुलसचिवपदासाठी पात्र व्यक्तीलाच स्थानापन्न नियुक्ती देणे गरजेचे असते.

कोण आहे पात्रताधारक?

स्थानापन्न कुलसचिवांचा कार्यभार स्वीकारण्यासाठी सध्या कार्यरत एकही उपकुलसचिव पात्रतेच्या अटी पूर्ण करीत नाहीत. विद्यापीठात उपकुलसचिवांपैकी डॉ. सुलभा पाटील व डॉ. दादाराव चव्हाण हे पीएच. डी. आहेत. परंतु अनुभवाची अट पूर्ण करीत नाहीत तर मीनल मालधुरे व मोनाली तोटे यांच्यासह ऋतुराज दशमुखे, मंगेश वरखेडे, विक्रांत मालविय, मंगेश जायले हे अधिकारी पीएच. डी. नाहीत. विद्यमान वित्त व लेखा अधिकारी डॉ. नितीन कोळी, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर, डॉ. मो. अतिक, डॉ. अविनाश असनारे व डॉ. प्रशांत गावंडे हे पात्रतेच्या अटी पूर्ण करतात; परंतु ते अर्जदार आहेत. अनुभवाचा विचार करता डॉ. एस. व्ही. डुडूल, डॉ. मोना चिमोटे, डॉ. डी. वाय. चाचरकर अथवा डॉ. अनिता पाटील यापैकी कोणाकडे स्थानापन्न कुलसचिवपदाचा कार्यभार जातो, हे बघावे लागेल.

डॉ. तुषार देशमुखांना नारळ कधी?

कुलसचिव डॉ. तुषार देशमुखांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवारी १९ मे रोजी पूर्ण होत आहे. कुलसचिवांना रविवार ऐवजी शनिवारी कार्यमुक्त करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे तर रविवारी कार्यमुक्त करण्यासाठी देशमुख आग्रही असल्याचे समजते. अनेकांना दरमहा नारळ देणाऱ्या कुलसचिवांना नियमबद्ध प्रशासन कधी नारळ देणार, याची चर्चा विद्यापीठात रंगली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठAmravatiअमरावती