शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र

By गणेश वासनिक | Updated: April 16, 2024 09:13 IST

भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, ‘प्रहार’चे दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. 

गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री डाॅ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला अमरावती मतदारसंघ हा देशभरात सतत चर्चेत राहिला. यंदा भाजप पहिल्यांदाच  या मतदारसंघात निवडणूक लढवीत आहे. काँग्रेसने २८ वर्षांनंतर उमेदवार रिंगणात उतरविला आहे. भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, ‘प्रहार’चे दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत. 

या मतदारसंघात यंदा ३७ उमेदवार रिंगणात आहेत. २०१९ ची निवडणूक वगळता शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अमरावतीची ओळख होती. मात्र हल्ली शिवसेना गटातटात विभागली गेली आहे. खासदार नवनीत राणा या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु, काहीच महिन्यात राणांनी केंद्र सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला हाेता. 

त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  असलेले आनंदराज आंबेडकर  यांची रिपब्लिकन सेनेकडून ‘वंचित’च्या पाठिंब्याने उमेदवारी कायम आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे.  आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध आमदार बच्चू कडू यांनी दंड थोपटल्याचे दिसून येते. एकंदरीत प्रहार, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार किती मते घेतात? यावर प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरेल. बसपाचे ॲड.  संजयकुमार गाडगे हे सुद्धा रिंगणात आहेत.

पहिल्यांदाच भाजप अन्‌ २८ वर्षांनंतर काँग्रेसअमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती राखीव जागेसाठी आहे. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने स्वतंत्रपणे ‘कमळ’वर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. तर तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रेस ‘पंजा’ घेऊन मैदानात उतरली आहे. दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या, हे विशेष. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या विजयासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. पदयात्रा, रॅली, कॉर्नर बैठका, थेट भेटीगाठींवर भर दिला जात आहे.  मात्र राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभांनंतर चित्र पालटण्याचे संकेत आहे.

गटातटाचा काय होणार परिणाम? - नवनीत राणा यांनी भाजपची उमेदवारी आणून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपचे निष्ठावंत आणि काही स्थानिक नेते अद्यापही या धक्क्यातून सावरले नाहीत. राणांसोबत प्रचाराला फिरत असले तरी त्यांच्या मनात वेगळेच आहे. - प्रहारचे दिनेश बुब, रिपब्लिकन सेेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीचा कुणाला फटका बसणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे. आमदार सुलभा खोडके या काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत.

एकूण मतदार    १८,३६,०७८ पुरुष - ९,४४,२१३महिला - ८,९१,७८०  निवडणुकीतील कळीचे मुद्दे- जिल्ह्यात उद्योगधंद्याचा अभाव आहे. अमरावतीत पंचतारांकित एमआयडीसी असूनही येथे एकही मोठा प्रकल्प नाही. बेलोरा विमानतळाचे भिजत घोंगडे कायम आहे. विमानांच्या टेकऑफची प्रतीक्षा आहे. - संत्रा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी त्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नाही. प्रत्येक लाेकसभा निवडणुकीत संत्रा प्रक्रिया आणि शेतकरी प्रश्नांवर राजकारण केले जाते. - बेरोजगारी समस्या असून, उच्चशिक्षितांना नोकरी नाही. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात हाेत असल्याची नाेंद आहे.

२०१९ मध्ये काय घडले?नवनीत रवी राणा    अपक्ष (विजयी)    ५,१०,९४७आनंदराव अडसूळ    शिवसेना    ४,७३,९९६गुणवंत देवपारे    वंचित बहुजन आघाडी    ६५,१३५नोटा    -    ५, १८२ 

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी? वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४    आनंदराव अडसूळ     शिवसेना        ४,६५,३६३    ४६%२००९    आनंदराव अडसूळ    शिवसेना        ३,१४,२८६    ४३%२००४    अनंत गुढे    शिवसेना    २,३२,०१६    ३३%१९९८    रा.सू. गवई    रिपाईं        २,३६,४३२    ३४%१९९६    अनंत गुढे    शिवसेना        २, १२,९८६    ४२%

टॅग्स :Amravatiअमरावतीnavneet kaur ranaनवनीत कौर राणा