शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी वन्यप्राण्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:14 AM

पोहरा : वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या हौसेखातर चिरोडी तलावावर अमरावती शहरातील युवकांचे जत्थे येत आहेत. त्यांनी सोबत आणलेल्या वाहनांच्या वर्दळीने ...

पोहरा : वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या हौसेखातर चिरोडी तलावावर अमरावती शहरातील युवकांचे जत्थे येत आहेत. त्यांनी सोबत आणलेल्या वाहनांच्या वर्दळीने प्रदूषणात भर घालण्यासोबतच तलावावर पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी पळून जातात. तलावाच्या परिसरात ऐन जनावरांच्या पाणी पिण्याच्या वेळेला गर्दी राहते. प्रतिबंधित क्षेत्रात होणारी ही गर्दी हटविण्यासाठी कुठलीही उपाययोजना अद्याप वनविभागाने केलेली नाही.

चिरोडी वर्तुळातील पश्चिम चिरोडी बीटमधील तलाव परिसरात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वावर आता सर्वांनाच ठाऊक आहे. तलाव परिसरात बिबट्यासह अन्य वन्यप्राणी आढळून येत असल्याने शहरातील तरुणांमध्ये या परिसराचे आकर्षण आहे. अमरावती शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर तलाव परिसरात अप्रतिम निसर्गसौंदर्य असल्याने दिवसेंदिवस युवकांची पावले त्याकडे वळली आहेत. त्यामध्ये वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा हौस असणाऱ्या नवख्या, श्रीमंत तरुणांचा भरणा आहे. या ठिकाणाला भेट देऊन एकदा तरी बिबट्याचे दर्शन घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. एवढेच नव्हे तर सोबतीला मित्र आणि खाण्याचे पदार्थ घेऊन पिकनिकला जाण्याच्या अविर्भावात हे कथित वन्यप्रेमी येथे दाखल होतात. या तलाव परिसराच्या कडेला बसून भोजनाचासुद्धा आस्वाद घेतात. त्यांच्या वारंवार दाखल होण्यामुळे वन्यजिवांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे.

चर खोदला, त्यानंतर स्वस्थता

मुळात वन्यपरिसर हा माणसांकरिता प्रतिबंधित क्षेत्र आहे. त्यामुळे वाहने रोखण्याकरिता तलावाकडे नेणाऱ्या पाऊलवाटेवर वनविभागाने चर खोदले. तेथपर्यंत वाहन नेऊन त्यापुढे पायी तलावाकडे जाऊन बिबट व आदी वन्य प्राण्यांचे फोटोसेशन करण्यासाठी भल्या पहाटे व रात्री अंधार पडल्यानंतर युवक आढळून येतात. चर खोदल्यानंतर मात्र वनविभागाने काहीही केलेले नाही.

-------------

मानव-वन्यप्राणी संघर्षाची भीती

जंगलातील एकमेव तलावावर शहरवासीयांनी ताबा केल्याने वन्यप्राणी पाण्याशिवाय परततात. अशा प्रसंगात एखादेवेळी बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ल्याची व त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

आळा बसेल तरी केव्हा?

वनक्षेत्रात मनुष्याने प्रवेश केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरुद्ध वन अधिनियमांनुसार गंभीर स्वरूपाचे वनगुन्हे दाखल करण्याबाबतचे फर्मान असून, या संरक्षित तलाव परिसराच्या वनक्षेत्रात प्रवेश करणे निषिद्ध आहे. ही नियमावली असूनही युवकांचा सततचा वावर ही बाब वन्यपशू, वन्यजिवांसाठी धोकादायक ठरणारी आहे. या नियमबाह्य प्रकाराला केव्हा आळा बसेल, याची प्रतीक्षा वन्यजीवप्रेमींकडून होत आहे.