शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कुटुंबासाठी महिला जातपंचायतीला भिडली; बहिष्कार टाकणाऱ्यांविरोधात गाठले पोलिस ठाणे

By प्रदीप भाकरे | Updated: January 11, 2025 06:22 IST

१० जणांवर गुन्हा

प्रदीप भाकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : जातपंचायतीने पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांवर सामाजिक बहिष्कार टाकत, कोणत्याही व्यक्तीने या कुटुंबाशी संवाद साधल्यास त्यांनाही समाजाबाहेर काढण्याचा आदेश दिला. हा अन्याय सहन न करता, थेट जातपंचायतीशी भिडत कुटुंबातील महिलेने पोलिस ठाणे गाठले. तिच्या या धाडसी कृतीमुळे जातपंचायतीतील दहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, महिलेच्या तक्रारीवरून जातपंचायतीतील दहा जणांविरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ५, ७ अन्वये गुन्हा दाखल झाला. १४ ऑगस्ट २०२४ रोजी जातपंचायतीने निर्णय दिल्यापासून हे कुटुंब सामाजिक बहिष्काराचा अन्याय झेलत होते. 

नेमके प्रकरण काय?

फिर्यादी महिलेकडे अन्य एक महिला आली. मी तुझ्या पतीपासून गर्भवती आहे, मला त्याच्याशी लग्न करायचे, असे ती म्हणाली. तिने पतीवर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला. यावर आपले लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते.  तिने लग्न केले नाही, असे पती म्हणाला. 

अन्य महिलेने जातपंचायत कार्यालयात फिर्यादी महिलेच्या पतीविरुद्ध तक्रार केली. त्यावर पंचायतने फिर्यादी महिला व तिच्या पतीला बोलावून घेतले व तक्रारदार महिलेसोबत लग्न करण्याचा आदेश दिला. त्याला पतीने नकार दिल्याने जातपंचायतमधील दहा जणांनी कुटुंबाला समाजामधून बाहेर काढल्याचा निर्णय दिला. समाजातील जी व्यक्ती या कुटुंबाशी बोलेल त्यांनाही समाजाबाहेर काढून टाकले जाईल, असा आदेश दिला.

यांच्यावर गुन्हा दाखल

संशयित आरोपींमध्ये दीपक पांडुरंग पवार, सुधाकर पवार, देवेंद्र सूर्यवंशी, धनराज पवार, शैलेश पवार, मनीष सूर्यवंशी (सर्व रा. विलासनगर, अमरावती) यांच्यासह किशोर पवार, ज्ञानेश्वर पवार, खेमराज सोळुंके (तिघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा) व देवा पवार (रा. तिवसा) यांचा समावेश.

टॅग्स :WomenमहिलाPoliceपोलिसAmravatiअमरावती