शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

प्रयोगशील शेतकऱ्यांचा जिल्हा परिषदेकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:10 AM

कृषी दिन : पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी इतरांनाही द्यावे प्रोत्साहन, प्रकाश साबळे अमरावती : जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शेतकरी बांधवांचे शेतीतील अभिनव ...

कृषी दिन : पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी इतरांनाही द्यावे प्रोत्साहन, प्रकाश साबळे

अमरावती : जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शेतकरी बांधवांचे शेतीतील अभिनव प्रयोग मार्गदर्शक ठरणार आहेत. विविध कारणांमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या प्रयोगांची माहिती देऊन प्रोत्साहित करावे, जेणेकरून ते जोमाने शेती करून सुजलाम् सुफलाम् होऊ शकतात, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी गुरुवारी येथे केले.

हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील १५ प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. त्यावेळी प्रकाश बोबडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती विठ्ठल चव्हाण होते. यावेळी सदस्य प्रकाश साबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विजय राहाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा कृषी विकास अधिकारी उज्ज्वल आगरकर आदी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय चवाळे, तर संचालन विवेक ढोमणे व आभार प्रदर्शन उज्ज्वल आगरकर यांनी केले. कार्यक्रमाला शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

रबी पीक स्पर्धेचे हे मानकरी

रबी हरभरा सर्वसाधारण गटात खारतळेगाव येथील आशिष क्षीरसागर, अंतरगाव येथील इंदूबाई धर्माळे, संग्रामपूर येथील भास्कर गावंडे, रबी गहू सर्वसाधारण गटात चौसाळा येथील नितीन घनमोडे, माणिकपूर येथील तुळशीराम मोरोपे, कुलंगणा येथील गनानन पोरे आणि रबी गहू आदिवासी गटातून बोराळा येथील रामदास बेठे, बिजू बेठे व झिंगापूर येथील श्रीराव चिलात्रे यांचा गौरव कृषिदिनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विभागातून सालोरा येथील ज्ञानेश्वर येवले या शेतकऱ्याला गौरविले गेले.

बॉक्स

खरीप पिकांसाठी या शेतकऱ्यांचा गौरव

उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकरी म्हणून आकाश कोकाटे (धानोरा कोकाटे, अमरावती), तर सोयाबीन, तूर, कापूस व अन्य पिकांचे विक्रमी उत्पादक भूषण पाटील (निरूळ गंगामाई, ता. भातकुली), विमला साव (मार्डा, ता. तिवसा), चंद्रशेखर बंड (शिरजगाव, ता. मोर्शी), सतीश कोरडे (जसापूर, ता. चांदूर बाजार), रामचंद्र खडसे (बेबळा बु., ता. दर्यापूर), रंगराव शिंगणे (कोतेगाव, ता. अंजनगाव सुर्जी), श्यामकांत करडे (येलकी पूर्णा), विनोद खेरडे (धोतरखेडा, ता. अचलपूर), सुशील नवखरे (अडगाव बु., नांदगाव खंडेश्र्वर), विजय बाबर (सोनगाव, ता. चांदूर रेल्वे), निखिल डुबे (आजनगाव, ता. धामणगाव रेल्वे), योगेश देशमुख (टेंभूरखेडा, ता. वरूड), रामगोपाल मावस्कर (टिटंबा, ता.धारणी), गणाजी जांबू (बोराळा, ता. चिलखदरा) यांचा समावेश आहे.