शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शिक्षण राज्यमंत्र्यांची पाठ फिरताच शाळेला टाळे; सांगा साहेब, आमची मुलं शिकवायची तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 12:29 IST

१ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे.

ठळक मुद्दे सिमोरीची शाळा बंदचव्यथा मेळघाटची

अमरावती : ‘साहेब, गेल्या आठवड्यापासून शाळेला कुलूप आहे. आम्ही आमची मुलं कुठे शिकवायची? मुख्याध्यापक, शिक्षक बेपत्ता आहेत. मुलांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण’, असा प्रश्न थेट आदिवासींनी जिल्हा प्रशासन व नेत्यांना केला आहे. त्यामुळे कालपर्यंत शिक्षणाचा गंध नसल्याची ओरड असलेल्या मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे गंभीर चित्र तालुक्यातील अतिदुर्गम सिमोरी येथील शाळेच्यानिमित्ताने पुढे आले आहे.

तालुक्यातील सिमोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला आठवडाभरापासून कुलूप लागले आहे. आदिवासी विद्यार्थी दररोज शाळेला कुलूप असल्याचे पाहून परत जात असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांसह शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली आहे. आठवड्यापूर्वी या परिसरात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांची कर्तव्यपूर्ती यात्रा हतरू येथे झाली. त्यानंतर शाळेला कुलूप लागले. दोन वर्षांपासून सर्व शाळा कोरोनाकाळात बंद होत्या. दि. १ डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासून शाळा उघडण्याचे आदेश जारी झाले. परंतु, हतरू जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद शाळा पूर्णपणे बंद आहे.

कोरोनाकाळात शाळा बंद असताना पन्नास टक्के शिक्षकसुद्धा बेपत्ता होते. आता शाळा सुरू झाल्या तरी कुलूपबंद आहेत. शनिवारी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती अविनाश मेटकर यांनी हतरू सर्कलमधील शाळांना भेट दिली. त्यात सिमोरीसह काही शाळा बंद होत्या. याबाबत आता जिल्हाधिकारी वा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

मुलांच्या शैक्षणिक ताणाला जबाबदार कोण?

अतिदुर्गम हतरू परिसरामध्ये आठवडाभरापासून शिक्षक, मुख्याध्यापक आलेले नाहीत. आमच्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न सिमोरी गावातील पालक शांताराम चिमोटे, विनोद बचले, महाजन बेठेकर, सुरेशपाल बेलकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष प्यारी महाजन बेठेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारीत विचारला आहे.

कर्तव्यपूर्ती झाली शिक्षक कर्तव्य विसरले

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी नुकतीच आदिवासींना विविध दाखले, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अतिदुर्गम भागापर्यंत कर्तव्यपूर्ती यात्रा काढली. त्याला प्रशासनातील अधिकारी ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांची उपस्थिती होती आणि आठवडा होत नाही तोच शाळांना कुलूप लागले. क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी गायब झाल्याचे चित्र आहे. त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी आदिवासींनी केली.

सीमोरी येथील शाळेला कुलूप असल्याची माहिती मिळाली. त्यासंदर्भात सोमवारी केंद्रप्रमुखांना तत्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संदीप बोडके, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चिखलदरा

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकMelghatमेळघाटChikhaldaraचिखलदरा