शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
3
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
4
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
5
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
6
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
7
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
8
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
9
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
10
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
11
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
12
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
13
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
14
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
15
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
16
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
17
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
18
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
19
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
20
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक

आजपासून १७ गाड्या होणार बंद; आरडीईचे नवे नियम लागू झाल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 9:34 AM

१ एप्रिल २०२३पासून भारतीय वाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील.

मुंबई : १ एप्रिल २०२३ नंतर भारतीयकार बाजारात १७ कार बंद होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक होंडाच्या ५, महिंद्राच्या ३, ह्युंदाई आणि स्कोडाच्या २-२ कार, रेनो, निसान, मारुती सुझुकी, टोयोटा आणि टाटा यांच्या प्रत्येकी एक कारचा समावेश आहे. यातील बहुतेक गाड्या  डिझेलच्या आहेत.

१ एप्रिल २०२३पासून भारतीयवाहन उद्योगात रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई)चे नवीन उत्सर्जन नियम लागू होतील. हे नियम लागू होताच, कार उत्पादकांना त्यांच्या कारचे इंजिन अपडेट करावे लागतील किंवा ते बंद करावे लागतील. नवीन नियमांमुळे उत्सर्जन मानके कंपन्यांना पाळावी लागणार असून, त्याचा थेट बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

ग्राहकांवर पडणार बोजा

वाहनांना नवीन उत्सर्जन नियमांचे पालन करण्यासाठी, विद्यमान मॉडेल्सची इंजिने अपडेट करावी लागतील. त्यामुळे कंपन्या वाहनांच्या किमती वाढवत आहेत.  २०२० मध्ये बीएस ६ इंजिनमुळे कारच्या किमती ५० ते ९० हजार, तर दुचाकींच्या किमती ३ ते १० हजार रुपयांनी वाढल्या होत्या. आताही कंपन्या वाहनांच्या किमतीत वाढ करणार आहेत.

ह्युंदाई माेटर्सने केली सुरुवात

केंद्र सरकार कठोर असल्याने ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या आय-२० कारचे डिझेल व्हेरियंट आधीच बंद केले आहे. याआधी टोयोटा आणि फोक्सवॅगननेही त्यांच्या डिझेल कार बंद करण्याची घोषणा केली आहे.

गाडीमध्ये बदल करावे लागणार

वाहनांच्या आरडीईनुसार, बीएस६ फेज-२ नियम १ एप्रिलपासून लागू होतील. अशा परिस्थितीत, या वाहनांना आरडीई मानदंडांची पूर्तता करणे कठीण होईल आणि कार निर्मात्या कंपन्यांना वाहनांची विक्री थांबवावी लागेल.

टॅग्स :carकारIndiaभारतAutomobileवाहन