शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

मंदीचा विळखा : 30 स्टील कंपन्यांना लागले टाळे; टाटा मोटर्सने उत्पादन थांबविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:02 IST

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर ...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात भारतातील उद्योग मंदीच्या विळख्यात अडकू लागले आहेत. वाहन क्षेत्राने तर गेल्या काही महिन्यांत विक्रीमध्ये कमालीची घसरण नोंदविली आहे. यामुळे अनेक शोरूम बंद पडू लागले असून या क्षेत्रावर अवलंबून असलेले जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. 

वाहन क्षेत्राने या वर्षीच्या सुरुवातीपासूनच विक्रीमध्ये घसरण नोंदविली आहे. भारताची सर्वात मोठी कंपनी मारुतीलाही याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कंपनीने काही दिवसांसाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. वाहन कंपन्यांनी उत्पादन थांबविल्याने याचा थेट फटका स्टील इंडस्ट्रीला बसला आहे. जमशेदपूरमधील 30 स्टील कंपन्यांनी काही दिवसांसाठी उत्पादन थांबवत टाळे ठोकले आहे. तर तेथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पाने उत्पादन थांबविले आहे. 

गुरुवारी जमशेदपूरमधील आदित्यपूर इंडस्ट्रियल एरियातील 12 स्टील कंपन्यांनी काम बंद करत टाळे ठोकले. तर अन्य 30 कंपन्यांनाही येत्या काही काळात टाळे ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. या सर्व कंपन्या टाटा मोटर्सला गाड्यांसाठी सुटे भाग पुरवितात. मागणी घटल्याने टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात सलग चौथ्यांदा काम थांबविले आहे. गुरुवार ते शनिवार कंपनीने काम थांबविले आहे. रविवारी कंपनीला सुटी असते. 

तसेच कंपनीने 1 हजार कर्मचाऱ्यांना 12 ऑगस्टलाच कामावर येण्याची सूचना केली आहे. तर नियमित कर्मचारी 5 ऑगस्टपासून कामावर येणार आहेत. गेल्या दोन महिन्यात कंपनीमध्ये केवळ 15 दिवस काम झाले आहे. 

30 हजार लोकांच्या रोजगारावर संकटजमशेदपुर, आदित्यपुरमध्ये जवळपास व्हेंडर कंपन्यांच्या 30 हजार लोकांच्या रोजगारावर संकट उभे ठाकले आहे. त्यातच राज्य सरकारने विजेचे दरही वाढविल्याने त्याचा फटकाही कंपन्यांना बसला आहे. 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगMaruti Suzukiमारुती सुझुकी