शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

मारुती लाँच करणार इलेक्ट्रीक वॅगन आर; पण तुम्ही खरेदी करू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 13:25 IST

भारतात नुकतेच पदार्पण करणारी आणि कमी काळात भरपूर बुकिंग मिळविणारी ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्सनेही इव्ही वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल लाँच केले आहे.

भारतात केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वाहन निर्मात्या कंपन्यांनी नाखुशीने का होईना इलेक्ट्रीक वाहने उतरविण्यास सुरूवात केली आहे. महिंद्रा, टाटानंतर आणखी एक भारतीय कंपनी मारुतीने त्यांची लोकप्रिय कार वॅगन आर ईव्ही लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही कार कंपनी नाखुशीनेच लाँच करत असल्याचे दिसत आहे. 

भारतात नुकतेच पदार्पण करणारी आणि कमी काळात भरपूर बुकिंग मिळविणारी ब्रिटीश कंपनी एमजी मोटर्सनेही इव्ही वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाने टिगॉरचे ईव्ही मॉडेल लाँच केले आहे. सध्या ही कार सरकारी कार्यालये, खासगी टूर्सपुरतीच मर्यादीत आहे. लवकरच ही कार सामान्यांसाठी लाँच केली जाणार आहे. मात्र, या ईव्ही कारसमोर मोठी आव्हाने आहेत. 

मारुती सुझुकी वॅगनआर ही कार लाँच करणार आहे. या कारची देशभरात टेस्टिंग सुरू आहे. मात्र, ही कार सामान्य ग्राहक खरेदी करू शकणार नाही. कारण या कारची किंमत 10 लाखांच्या वर असणार आहे. या कारची बॅटरी महागडी असल्याने इलेक्ट्रीक वाहनेच महाग असणार आहेत. ह्युंदाईने नुकतीच लाँच केलेली कोना ही कार तब्बल 25 लाखांच्या वरच मिळते. यामुळे इलेक्ट्रीक कार परवडणाऱ्या किंमतीत नसल्याने ग्राहकांचा ओढा पेट्रोल, सीएनजी कारवरच अधिक आहे. सध्या विशिष्ट वर्गच या इलेक्ट्रीक कारकडे वळत असून त्यांच्याकडे बॅटरी बदलण्याची आणि एवढी महागडी कार घेण्याची ताकद आहे, असा हा वर्ग आहे. 

इलेक्ट्रीक वाहनाची एका चार्जिंगमध्ये जाण्याची रेंज खूप कमी आहे. ह्युंदाईच्या कोनाची रेंज 452 किमीच्या आसपास असल्याचा कंपनीने दावा केलेला आहे. मात्र, ट्रॅफिक, खड्डे, संथगतीची वाहतूक आदी गोष्टींचा विचार केल्यास ही रेंज खूपच कमी होणार आहे. टाटा, महिंद्राच्या कारना फारतर 100 चा आकडा गाठता आला आहे. यामुळे या कार केवळ सरकारी कार्यालये, ओला, उबर सारख्या कंपन्या खरेदी करत आहेत.

शहरांतही परिस्थिती बिकटदेशभरातच नाही तर शहरांमध्येही चार्जिंग स्टेशनची वानवा आहे. घरी चार्ज करायचे असल्यास कमीतकमी टू फेज वीज कनेक्शन लागेल. तसेच स्वत:ची पार्किंग स्पेसही लागेल. उत्तुंग इमारत असल्यास किंवा 4 ते 5 मजल्याची इमारतही असल्यास कार तळमजल्यावर पार्क केली जाते. यामुळे कारपर्यंत वीज कनेक्शन नेणे हे देखील अवघड ठरणार आहे. कॉमन पार्किंग असल्यास प्रत्येकवेळी कार कुठे चार्ज करायची असाही प्रश्न ग्राहकांना सतावत आहे. कारची रेंजही कमी असल्याने इच्छित स्थळी जाणे दिव्यच ठरणार आहे. एका चार्जिंगसाठी दीडे ते दोन तास थांबावे लागण्याची शक्यता आहे. शिवाय वेटींग पिरिएड असेल तो वेगळाच वेळ यामुळे 400 ते 500 किमी जाण्यासाठी प्रवासाचा वेळ आणि चार्जिंगचा असा दुप्पट वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे वाहन कंपन्याही संकटात आल्या आहेत. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कारTataटाटाHyundaiह्युंदाईMG Motersएमजी मोटर्स