शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

Maruti Suzuki Recall: अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा, गाड्या वापरू नका! मारुतीचा हजारो कारमालकांना तातडीचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:37 AM

कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे. 

भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने बुधवारी अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारापर्यंत हजारो कार एका मोठ्या समस्येमुळे माघारी बोलावल्या आहेत. कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये याची माहिती दिली गेली आहे. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे. 

कार रिकॉल करून ही समस्या दुरुस्त केली जाणार आहे. या कार ८ डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या काळात उत्पादित करण्यात आल्या होत्या. Alto K10, S-Presso, Eeco, Brezza, Baleno आणि Grand Vitara ची जवळपास 17,362 यूनिट्स रिकॉल करण्यात आली आहेत. 

रिकॉल केल्या गेलेल्या कार मारुतीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये तपासल्या जाणार आहेत. गरज भासल्यास सदोष एअरबॅग कंट्रोलर बदलला जाईल. या समस्येमुळे अपघात झाल्यास एअरबॅग आणि सीट बेल्ट प्रीटेन्शनर त्यांचे काम करण्यात अपयशी ठरण्याची शक्यता आहे. 

या सदोष सिस्टिम असलेल्या कारमधील दुरुस्ती होईपर्यंत ग्राहकांनी त्यांच्या कार चालवू नयेत किंवा त्यांचा वापर करू नये असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. प्रभावित वाहन मालकांना तातडीने मारुती सुझुकी डीलरशिपकडून कळविले जाणार आहे. 

मारुती सुझुकी इंडियाने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती सुमारे 1.1 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. एप्रिल 2022 नंतर चालू आर्थिक वर्षात ही दुसरी वेळ आहे.  

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकी