शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
4
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
5
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
6
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
7
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
8
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
9
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
10
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
13
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
14
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
15
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
16
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
17
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
18
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

वाहन चालवणाऱ्यांनो सावधान! नितिन गडकरींनी दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 7:17 PM

भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, हे प्रमाण जगातील सर्वाधिक अपघातांपैकी एक आहे. या अपघातांमध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर जवळपास 3 लाख लोक गंभीर जखमी होतात.

केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कार, मोटारसायकल, स्कूटर किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणाऱ्यांसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी नुकतेच सांगितले की, भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, हे प्रमाण जगातील सर्वाधिक अपघातांपैकी एक आहे.

या अपघातांमध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर जवळपास 3 लाख लोक गंभीर जखमी होतात. गडकरी म्हणाले, दुर्देवाची गोष्ट म्हणजे 70 टक्के मृत्यू हे 18 ते 45 वयोगटातील लोकांचे होतात. रस्ते सुरक्षा ही आमच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

गडकरी म्हणाले, अपघातांची शक्यता कमी करण्याच्या दृष्टीने ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमसोबतच AI-आधारित तंत्रज्ञानाचीही आवश्यकता आहे. तसेच, रस्ते सुरक्षा हा जगभरात चिंतेचा विषय असून भारतासारख्या विकसनशील देशांसाठीही हे एक आव्हान आहे. या रस्ते अपघातांच्या फॉरेन्सिक तपासणीसाठी एआय-आधारित ड्रोन आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

गडकरींच्या मते, मागणी आणि पुरवठा यांच्यातील असंतुलनामुळे वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत एआय आधारित साधनांच्या मदतीने रहदारीच्या स्थितीची अचूक तपासणी, विश्लेषण आणि तिचा अंदाज लावला जाऊ शकतो. याशिवाय, भारतीय महामार्गांवर एक प्रगत अशी वाहतूक व्यवस्था प्रणाली तयार करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि एचडी कॅमेऱ्यांच्या मदतीने डेटा संकलित केला जातो, असेही गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहनBJPभाजपाAccidentअपघात