शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

स्कॉर्पिओच्या एअरबॅग न उघडल्याने मुलाचा मृत्यू; बापाने आनंद महिंद्रांवर केस ठोकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 16:44 IST

पोलिसांनुसार राजेश यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला त्यांनी महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही गिफ्ट केली होती.

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून महिंद्रा कंपनी आणि उद्योगपती आनंद महिंद्रांसाठी वाईट खबर येत आहे. एका व्यक्तीने महिंद्रा कंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आणि त्यांच्या कंपनीच्या १३ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. कानपूरच्या रायपूरवा पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनुसार राजेश यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा अपूर्व मिश्राला त्यांनी महिंद्राची स्कॉर्पिओ एसयुव्ही गिफ्ट केली होती. १४ जानेवारी, २०२२ ला त्यांचा मुलगा मित्रांसोबत लखनऊहून कानपूरला येत होता. धुक्यामुळे त्याची कार डिव्हायडरवर आदळली होती. यात अपूर्वचा मृत्यू झाला होता. 

महिंद्राच्या तिरुपती ऑटोमधून ही कार खरेदी करण्यात आली होती. मुलाने सीटबेल्ट लावला होता तरी कारच्या एअरबॅग उघडल्या नाहीत. तसेच फसवून आपल्याला ही कार विकली गेली असा आरोप त्यांनी केला आहे. कारची योग्यरित्या तपासणी केली असती तर त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला नसता, असा त्यांनी महिंद्रांवर आरोप ठेवला आहे. 

यावर बोलताना राजेश यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अभद्र वागणूक आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजेश यांच्या दाव्यानुसार त्यांनी फॉल्टी कार शोरुमच्या समोर आणून उभी केली आहे. कंपनीने कारमध्ये एअरबॅगच लावल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजेश यांनी कोर्टाच्या माध्यमातून हा खटला दाखल केला आहे.  

 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राAccidentअपघात