शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

सुरक्षित ड्रायव्हिंग आपण कधी शिकणार? गाडीचे ‘एन कॅप’ रेटिंग महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 4:57 PM

सीट बेल्ट लावलाच नाही तर अपघाताच्या वेळी वाहनाच्या मागील सीटवर बसलेली व्यक्ती ४० पट वेगाने फेकली जाते. अशा वेळी एअर बॅग्ज कुचकामी ठरतात. 

विनय उपासनी -मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनामुळे रस्ते अपघातांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एनसीआरबी अहवालात दर १०० किमी अंतरावर ४० जण रस्ते अपघातात मृत्युमुखी पडत असल्याचे भयावह चित्र समोर आले होते. बहुतांश अपघात चालकाला वेगावर नियंत्रण करता न आल्याने, तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने झाल्याचे या अहवालात अधोरेखित झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षित ड्रायव्हिंग, वाहनाची सुरक्षा मानके, वाहतुकीच्या नियमांचे पालन वगैरेंचा घेतलेला आढावा...

सीट बेल्ट लावलाच नाही तर काय?- अपघाताच्या वेळी वाहनाच्या मागील सीटवर बसलेली व्यक्ती ४० पट वेगाने फेकली जाते. - अशा वेळी एअर बॅग्ज कुचकामी ठरतात. - या मोक्याच्या आणि धोक्याच्या क्षणीच सीट बेल्ट महत्त्वाची भूमिका बजावतो. - गाडीच्या पुढील भागात बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला असेल आणि मागच्या व्यक्तीने लावला नसेल, तर मागचा प्रवासी ४० पट वेगाने त्याच्यावर कोसळण्याचा धोका असतो. याकरिता सीट बेल्ट लावणे महत्त्वाचे ठरते. 

सीट बेल्ट लावणे अगत्याचे -- सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात अतिवेगाने वाहन चालविल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. - कोणत्याही वाहनात आतील प्रवाशांच्या जिवाची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षा पुरविलेली असते. - सीट बेल्ट, एअर बॅग्ज, हँड ब्रेक, इमर्जन्सी ब्रेक ही त्यातली काही ठळक उदाहरणे.- सर्वसाधारण समज असा की, सीट बेल्ट फक्त पुढे बसलेल्या प्रवाशानेच लावायचा असतो. मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाने तो लावला नाही, तरी चालतो.  - हा समज अत्यंत चुकीचा आहे. वाहनात बसलेल्या प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावणे अगत्याचे आहे. 

क्रॅश टेस्टिंगवर रेटिंग -एन कॅप रेटिंग ही अलीकडच्या काळातील संकल्पना आहे. ब्रिटनमधील ग्लोबल एन कॅप ही एक वैश्विक संस्था आहे. या ठिकाणी गाडीची क्रॅश टेस्टिंग केली जाते. ६० ते ६५ किमी प्रतितास वेगाने गाडीची गती साधत ती क्रॅश केली जाते. त्यातून होणाऱ्या मानवी इजांना अनुसरून गाड्यांच्या एन कॅप स्कोअर काढला जातो. भारतातील गाड्यांना आता एन कॅप रेटिंग दिले जाते. 

आलिशान गाड्यांतील सुरक्षा फीचर्स --  आधुनिक गाड्यांमध्ये काही खास फीचर्स असतात, जे कार्यान्वित केले की गाडी आपोआप थांबते वा सुरू हाेते. -  समोर असलेल्या गाडीचा वेग कमी झाल्यास आपल्या गाडीचाही वेग कमी होतो.

-  ड्रायव्हरला झोप लागत असेल किंवा पेंग आली, तर वॉर्निंग बीप वाजते. -  रस्त्यालगत असलेल्या गाइडलाइन्सनुसार गाडी आपोआप वळते. -  सहा एअर बॅग्ज, सेन्सर्स, गाडीचा वेग नियंत्रित करण्यासाठी ऑटो लॉक.  

केवळ गाडीत सुरक्षेचे अनेक फीचर्स असून उपयोग नाही. त्यांचा तंतोतंत वापर गाडीतील प्रवासी करतात का, हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्याकडे नेमकी याचीच वानवा आहे, तसेच वाहतुकीचे नियम पाळताना आपण भारतीय खूपच बेफिकीर असतो. या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. विशेषत: अवजड वाहनांनी वाहतुकीचे नियम काटेकोर पाळणे आवश्यक आहे. कारण त्यांनी एखाद्या छोट्या कारला धडक दिली, तर त्यांचे फारसे नुकसान होत नाही.  - समीर ओक, ऑटो एक्सपर्ट. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाcarकारAccidentअपघात