शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

आजारी असूनही पी.व्ही. सिंधूने दुबई बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिली कडवी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:26 IST

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पी.व्ही.सिंधूचा पराभव झाला असला तरी सिंधू तब्येत बरी नसताना अंतिम फेरीचा सामना खेळत होती.  

ठळक मुद्देदुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा तीन गेममध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  गोपीचंद यांनी प्रशिक्षणातील आव्हाने आणि सिंधूची 2018 बॅडमिंटन मोसमासाठी कशी तयारी आहे त्याची माहिती दिली.  

नवी दिल्ली - दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये पी.व्ही.सिंधूचा पराभव झाला असला तरी सिंधू तब्येत बरी नसताना अंतिम फेरीचा सामना खेळत होती.  या संपूर्ण स्पर्धेदरम्यान सिंधू आजारी होती. ती सर्दीने हैराण झाली होती. पण तरीही तिने अंतिम फेरीत उत्तम लढत दिली असे सिंधूचे प्रशिक्षक पुललेला गोपीचंद यांनी सांगितले.  टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना गोपीचंद यांनी प्रशिक्षणातील आव्हाने आणि सिंधूची 2018 बॅडमिंटन मोसमासाठी कशी तयारी आहे त्याची माहिती दिली.  

दुबई ओपन सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या अकाने यामागुचीनं सिंधूचा तीन गेममध्ये 1-2 अशा फरकानं पराभव केला.  अकाने यामागुचीनं जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानावर आहे. पहिला सेट जिंकल्यानंतर  दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये यामागुचीच्या आक्रमक खेळीपुढे सिंधूचा पराभव झाला. यामागुचीनं 21-15, 12-21, 21-19 असा सिंधूचा पराभव करत चषकावर नाव कोरलं. 

जिंकण्यासाठी तुम्हाला शेवटचा पराभव विसरुन वेगाने पुढे जावं लागतं असे गोपीचंद म्हणाले.  प्रशिक्षक म्हणून काम करताना खेळाडू त्याच्या पराभवावर जास्त विचार करणार नाही याकडे तुमचे लक्ष असले पाहिजे. खेळाडूला पुढच्या लढतीसाठी मानसिक दृष्टया तयार ठेवण्याची जबाबदारी आव्हानात्मक असते. पराभवातून पुन्हा उभे राहण्यासाठी खेळाडूला मदत करण्याची प्रशिक्षक म्हणून माझी जबाबदारी आहे असे गोपीचंद म्हणाले. 

बॅडमिंटन वेळापत्रक व्यस्त; पण पर्याय नाहीभारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे.   भारतीय खेळाडू गरजेपेक्षा अधिक स्पर्धा खेळत असल्याचे विधान दिग्गज खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी नुकतेच केले. त्यांच्या वक्तव्यानंतर देशात बॅडमिंटनपटूंच्या व्यस्त वेळापत्रकाचीच चर्चा सुरू झाली. एका कार्यक्रमात बोलताना गोपीचंद म्हणाले,‘व्यस्त वेळापत्रकाचा फटका केवळ भारतीय खेळाडूंनाच नव्हे तर जगातील खेळाडूंना बसतो आहे. महत्त्वपूर्ण असलेल्या आशियाई आणि राष्ट्रकुलसारख्या स्पर्धांमध्ये खेळणे गरजेचे असल्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी पाठोपाठ स्पर्धा खेळणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.’

युरोपातील खेळाडू राष्ट्रकुल किंवा आशियाई खेळात खेळत नाहीत पण आमच्या खेळाडूंपुढे पर्याय नाही. आमच्या खेळाडूंना परिस्थितीशी ताळमेळ साधावाच लागेल. प्रवास करताना देखील सरावाकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ भारताच्या अव्वल खेळाडूंना विश्रांती देत राष्ट्रकुलमध्ये दुय्यम दर्जाचा संघ पाठविणे योग्य राहील का, असा सवाल करताच गोपीचंद म्हणाले, ‘नाही. राष्ट्रकुल ही महत्त्वाची स्पर्धा असल्याने आम्हाला दुय्यम दर्जाचे खेळाडू पाठविता येणार नाही. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू