शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

भारतात बास्केटबॉलचा दर्जा उंचावतोय, राजवीरसिंग भाटीचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 00:36 IST

भारतात बास्केटबॉलचा दर्जा उंचावत असून, सरकारने सुविधा दिल्या तर भारतीय संघही आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक निकाल देऊ शकतो, असे मत बिकानेरचा १५ वर्षीय युवक राजवीरसिंग भाटीने व्यक्त केले. भाटीने काठमांडू येथे आयोजित दक्षिण आशियन अंडर-१६ बास्केटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावणा-या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

नागपूर : भारतात बास्केटबॉलचा दर्जा उंचावत असून, सरकारने सुविधा दिल्या तर भारतीय संघही आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक निकाल देऊ शकतो, असे मत बिकानेरचा १५ वर्षीय युवक राजवीरसिंग भाटीने व्यक्त केले. भाटीने काठमांडू येथे आयोजित दक्षिण आशियन अंडर-१६ बास्केटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावणा-या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त भाटी येथे आला आहे.सध्या नोएडा येथे एनबीए अकादमीत सराव करीत असलेल्या भाटीने या वेळी एसजेएएनच्या कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. तो म्हणाला, ‘युरोपियन व अन्य देशांमध्ये बास्केटबॉलचा दर्जा बघता आपण पिछाडीवर असल्याचे कबूल करतो. यापूर्वीच्या तुलनेत भारतात आता या खेळासाठी सुविधा वाढलेल्या आहेत. जर तुमच्यामध्ये प्रतिभा असेल तर बास्केटबॉलमध्येही चांगले करिअर करता येते.’मलेशिया येथे होणाºया आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे पुढचे लक्ष्य आहे, असेही त्याने सांगितले. भाटी चीन व आॅस्ट्रेलियामध्ये १० दिवसांच्या शिबिरांमध्ये सहभागी झाला होता. तो म्हणाला, ‘सध्या मी नोएडातील एनबीए अकादमीमध्ये सराव करीत आहे. त्यासोबत शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले आहे.’यापूर्वी भाटी गुजरातमध्ये झालेला भारताच्या अंडर-१४ संघाच्या शिबिरात सहभागी झाला होता. त्यासोबत राजस्थानला राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. सहा फूट दोन इंच उंची लाभलेला भाटी आपल्या स्वप्नाबाबत बोलताना म्हणाला, ‘भारतीय बास्केटबॉल संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरावा, असे माझे स्वप्न आहे.’ भारतीय बॉस्केटबॉल संघाने यापूर्वीकेवळ एकदाच आॅलिम्पिकमध्ये (मॉस्को आॅलिम्पिक १९८०) प्रतिनिधित्व केले आहे.काठमांडू येथील स्पर्धेमध्ये हा अनुभव चांगला होता. भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि मालदीव यांच्यासह आम्ही दक्षिण आशियातील सर्व देशांविरुद्ध विजय मिळवला आणि जेतेपद पटकावले.- राजवीरसिंग भाटी

टॅग्स :Sportsक्रीडा