शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

केसांना तेल लावण्याचा काही उपयोग नाही! जर तुम्ही 'या' चुका करत असाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 15:22 IST

सुंदर लांबसडक केस सगळ्यांनाच हवे असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात.

सुंदर लांबसडक केस सगळ्यांनाच हवे असतात. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. केसांना पोषण मिळण्यासाठी तेल लावण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. नारळाचं तेलं, बदामाचं तेलं, राईचं तेलं अशा वेगवेगळ्या तेलांचा वापर केसांवर करून स्त्रिया केसांची काळजी घेतात. तसंच काहीवेळा तेल कोमट करून त्यात  काही वनस्पती घालून सुध्दा महिला आपल्या केसांना लावत असतात. पण हे लावत असताना काही चुका केल्यास महागात पडू शकतं.  केसांना तेल लावत असताना जर काही चुका केल्या तर तेल लावून काही उपयोग होत नाही. 

बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे तसंच पोषक घटकांच्या कमतरतेमुळे   केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवते. तसंच कोंडा झाल्यामुळे खाज  येते. कारण केसांना तेल लावताना जर तुम्ही काही चुका केल्या तर तुम्हाला समस्या जाणवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या चुका केल्यास तुम्हाला महागात पडू शकतं.

एकाचवेळी जास्त तेल लावणे

 सध्याच्या काळात महिला कामामुळे स्वतःसाठी वेळ काढू  शकत नाहीत. त्यामुळे त्यांना बसून केसांना तेल लावणं, केसांची मालीश करणं  शक्य होत नाही. म्हणून काही महिला आठवड्यातून एक दिवस जेव्हा वेळ मिळत असतो तेव्हा जास्त तेल लावतात. असं केल्यास  केस शॅम्पूने  धुताना तेल व्यवस्थित निघत नाही.  तसंच शॅम्पूचा जास्त वापर केल्याने केसांचा चमकदारपणा निघून जातो आणि केस कोरडे दिसू लागतात. 

केस घट्ट बांधणे

केसांना तेल लावल्यानंतर केसांची मुळं नाजूक आणि सैल झालेली असतात जर अशा वेळी केसांना तुम्ही घट्ट बांधून ठेवले तर केस मोठ्या प्रमाणावर गळण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांना घट्ट बांधण्याऐवजी जर तुम्ही केसांची वेणी घातली किंवा केस मोकळे सोडले तर फायदेशीर ठरेल. 

तेल लावल्यानंतर केस जास्त वेळ तसेच ठेवणे

अनेक महिलांचा असा समज आहेत  की तेल लावल्यानंतर बराच वेळ किंवा अनेक दिवस केस तसेच राहू दिले तर पोषण मिळतं पण असं नसून जर केसांना तेल लावल्यानंतर काही तासांच्या आत धुतले नाही तर  केंसावर आणि केसांच्या मुळांवर  धुळीचे कण बसण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे केस खराब व्हायला वेळ लागणर नाही. त्यामुळे तेल लावल्यानंतर २ ते ३  तासांनी  केस धुवून टाका.

तेल लावल्यानंतर कंगवा फिरवणे

(image credit- beautycentralmelta.com)

जर तुम्ही तेल लावल्यानंतर लगेच कंगवा फिरवत असाल तर  केसांच्या मुळांना त्रास होऊन केस गळू शकतात. कारण तेल लावल्यानंतर  केसांची मुळं नाजूक झालेली असतात. कंगवा  फिरवल्यानंतर केस तुटण्याची शक्यता असते.

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स