शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

दुष्काळमुक्तीसाठी ५ मिनिटांत जमा झाला २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिका-यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटात २५ लाख रुपये दुष्काळी ...

ठळक मुद्देसामाजिक संस्थांच्या पुढाकाराने महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू- शांतीलाल मुथ्था

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दुष्काळाच्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे हा आपला धर्म आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकºयांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केल्यानंतर संघटनेच्या पदाधिका-यांनी दातृत्वाची भूमिका घेत मदतीचा हात दिला. केवळ पाच मिनिटात २५ लाख रुपये दुष्काळी कामासाठी जमा झाल्याचे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी डिझेलसाठी ६० हजार रुपये जमविल्यास जैन संघटनेच्या स्थानिक पदाधिका-तर्फे २० हजार रुपये प्रत्येक गावासाठी देण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यातील केज, धारूर, अंबेजोगाई, परळी तालुक्यांमधील तहसीलदार, कृषी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, बीजेएसचे कार्यकर्ते, तालुका प्रतिनिधींच्या उपस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सभा झाली.श्रमदानाचा टप्पा पूर्ण केलेल्या गावांना भारतीय जैन संघटनेने मोफत जेसीबी,पोकलेन पुरवून दुष्काळ मुक्तीच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे. वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांतील ग्रामस्थांचा श्रमदानाचा वेग वाढविणे, श्रमदान करणाºया गावांना डिझेल पुरविण्याची प्रक्रिया सोपी करणे, लोकवर्गणीतून डिझेल भरण्याची व्यवस्था करणे या मुख्य मुद्द्यांवर सभेत चर्चा झाली.

या वेळी आ. प्रा. संगीता ठोबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, प्राचार्य डॉ. आय. बी. खडकभावी, तहसीलदार शरद झाडके, सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुंदडा, पंचायत समिती उपसभापती तानाजी देशमुख, विजय वाकेकर, विजयराज बंब, संतोष कुंकुलोळ, नगरसेवक मिलिंद बाबजे, बीडीओ दत्ता गिरी, किशोर बंब, पानी फाउंडेशनचे संतोष सिंनगारे, प्रसाद चिक्षे, ज्ञानप्रबोधिनीचे पदाधिकारी व्यासपीठावर होते.

श्रमदान करणाºया गावांना शासनातर्फे दिला जाणारा निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी सूचना आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी प्रशासनास केली. भारतीय जैन संघटना व इतर सामाजिक संघटनांमुळेच गावे टंचाईमुक्त झाली आहेत, अशा शब्दात दुष्काळाविरुद्ध लढणाºया सामाजिक संस्थांचा आ. प्रा. ठोंबरे यांनी गौरव केला. आतापर्यंतचे काम उत्कृष्ट असून पहिला पुरस्कार अंबाजोगाईला मिळावा, यासाठी संघटीतपणे प्रयत्न करू, असे आवाहन त्यांनी केले. उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले, श्रमदान करणाºया गावांमध्ये जेसीबीला लागणाºया डिझेलसाठी शासनातर्फे आर्थिक तरतूद केली आहे. तो ग्रामपंचायतींना वर्ग केला जाणार आहे.

राजकिशोर मोदी , अक्षय मुंदडा , संतोष सिंनगारे, किशोर पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. रतीलाल कुंकुलोळ, निलेश मुथ्था, जैन श्रावक संघ अंबेजोगाइचे अध्यक्ष प्रेमचंद बडेरा, गौतमचंद सोळंकी, प्रकाश मुथ्था, प्रेमचंदजी मुथ्था, शांतीलाल सेठिया, प्रकाश सोळंकी, विजय मुथ्था, सुनील मुथ्था, ललित मुथ्था, अमित रांदड, इंदर लोढा, संतोष कुंकलोळ, नागेश औताडे, सतीश मोरे, नानासाहेब गाठाळ, मिलिंद बाबजे, मनोज लखेरा, संजय सुराणा, गणेश उमनवार आदी उपस्थित होते.

पाण्यासाठी युद्धाची वाट नको, दुष्काळाशी युध्द कराभूकंप, दुष्काळ, मुलींची घटती संख्या यामुळे बीड जिल्ह्याचे चित्र खूप भयानक निर्माण झाले आहे. नकारात्मक परिस्थितीतून जिल्ह्याला बाहेर काढणे एक आव्हान आहे. सलग १० वर्षे काम केल्यास समस्यांवर मात करण्यात यश मिळते.आमीर खान यांनी पाणीप्रश्न हाती घेतला तेंव्हा दुष्काळाची समस्या सुटेल अशी प्रत्येकाची भावना झाली आहे. भविष्यात महाराष्ट्रासाठी नक्कीच चांगले दिवस येतील. पाण्यासाठी युद्ध होईल यासाठी वाट बघत बसण्यापेक्षा दुष्काळाविरुद्ध युद्ध पुकारले तर सर्व समस्या सुटतील असे शांतीलाल मुथ्था यावेळी म्हणाले.

टॅग्स :Beedबीडdroughtदुष्काळFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा