शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
3
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
4
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
6
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
7
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
8
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
9
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
10
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
11
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
12
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
13
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
14
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
15
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
16
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
17
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
18
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
19
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश

माजलगाव धरण, गोदावरी पात्रात २८ हजार ५५० क्युसेक आवक; २६ गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 6:22 PM

सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते.

- पुरूषोत्तम करवामाजलगाव (बीड) : जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने १८ दरवाजे वर उचलून गोदावरी पात्रात २८ हजार क्युसेक तर माजलगाव धरणात ५५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी पात्रात केव्हाही पाण्यात वाढ होऊ शकते. वाढणाऱ्या पाणी पातळीमुळे गोदावरीपात्रा शेजारीलं गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने गोदापात्रा शेजारील २६ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाथसागर धरणाच्यावरील भागात जास्त पाऊस झाल्याने धरणात पाणीसाठी ९० टक्क्यांवर झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जायकवाडीतून गोदावरी नदी पात्रात व माजलगाव धरणात पाणी सोडले आहे. माजलगाव धरणात तीन दिवसापासून तर गोदावरी पात्रात दोन दिवसापासून पाण्याची आवाक सुरू आहे. माजलगाव धरणात मंगळवार रोजी ५५० क्युसेक तर गोदावरी नदीपात्रात २८ हजार २९६ क्युसेक अशी आवक सुरु आहे.

ही आवक लवकरच गोदापात्र आणि धरणात येईल. तसेच पुढील काही दिवसात जास्त पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आताची आवक आणि नंतर पावसामुळे होणाऱ्या पाणीपातळीतील वाढ यामुळे माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात शेजारील गावातील नागरिकांमध्ये आत्तापासूनच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या माजलगाव धरणात ४१ टक्के पाणीसाठा असून एक दोन मोठ्या पावसात हे धरण केंव्हाही भरू शकते. त्यामुळे दोन्ही धरणातून पाणी सोडण्याची वेळ आल्यास अनेक गावांना धोका निर्माण होऊ शकतो.

माजलगाव तालुक्यातील जवळपास २६ गावांना गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या निसर्गामुळे धोका निर्माण होऊ शकतो यामुळे प्रशासनाने या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या येथील उपविभागीय अधिकारी नीलम बाफना व तहसीलदार वर्षा मनाळे यावर लक्ष ठेवुन आहेत.

या गावांना धोक्याचा इशारानाथसागर व माजलगाव धरण भरल्यास माजलगाव तालुक्यातील मोगरा, गंगामसला, आबेगाव, छत्रबोरगाव, सादोळा, मंजरथ, सरवर पिंपळगाव, सोमठाणा, पुरूषोत्तमपुरी, शेलगावथडी, काळेगावथडी, डुब्बाथडी, महातपुरी, कवडगावथडी, गव्हानथडी, रिधोरी, हिवरा , जायकोवाडी, आळसेवाडी, आडोळा, सुरूमगाव, गुंजथडी, सोन्नाथडी, शुक्लतिर्थलिमगाव, पिंप्रीखुर्द, खतगव्हाण या गावांसह माजलगाव शहरातील आंबेडकर नगर भागास धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBeedबीडJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी