शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

केजमध्ये शेतकऱ्यांचे २ तास झोपा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केज : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ‘आमचंबी ठरलंय’ म्हणत ...

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शेतक-यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनानुसार ‘आमचंबी ठरलंय’ म्हणत पंधरा-वीस गावातील शेतक-यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर दोन तास झोपून आंदोलन केले.तालुक्यातील शेतक-यांच्या पशुधनाला दावणीला चारा-पाणी द्यावा, शेतक-यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पावसाअभावी वाळलेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, खरीप २०१७ तसेच २रबी २०१८ चा विमा शेतक-यांना द्यावा, २०१९ चा खरीप विमा जाहीर करून तोही तात्काळ वाटप करावा, टंचाई परिस्थितीवर तत्काळ उपाय करावेत, शेतकरी सन्मान योजनेची पूर्ण रक्कम शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावी, पीक कर्जासाठी शेतक-यांची पिळवणूक थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी पंधरा-वीस गावातील शेतकरीआंदोलनात सहभागी झाले होते. यापूर्वी याच आंदोलकांनी दोन सप्टेंबर रोजी कुंबेफळ येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.शेतकरी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यासाठी गेले असता उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी निवेदन स्वीकारत या प्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी