शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
3
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
4
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
5
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
7
Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!
8
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
9
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
10
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
11
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
12
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
13
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
14
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
15
"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
16
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
17
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
18
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
19
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
20
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

बीड जिल्हा विभागात तिसऱ्या क्रमांकावर ९९.९६ टक्के निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:26 AM

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात ...

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने शुक्रवारी दुपारी इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात ४० हजार ५३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बीड जिल्हा विभागात संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर राहिला. दरम्यान, दुपारी एक वाजेपासून निकाल दर्शविणाऱ्या बोर्डाच्या संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने उत्सुकता लागलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले. बीड जिल्ह्यातून ४० हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाती. त्यापैकी ४० हजार ५३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २५ हजार ८३२ विद्यार्थी विशष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ग्रेड १ मध्ये १३ हजार ५६१, ग्रेड २ मध्ये ११११, १८ विद्यार्थी ग्रेड पास, तर एकूण ४० हजार ५२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ९९.९६ टक्के लागला आहे.

----------

तालुकानिहाय निकाल प्रविष्ट विशेष प्रावीण्य एकूण उत्तीर्ण निकाल

धारूर १०३४ ०६५७ १०३३

परळी ४२७९ २३७४ ४२७८ ९९.९७

केज ४१७१ ३१४० ४१६८ ९९.९२

अंबाजोगाई ४४७० २६७२ ४४६९ ९९.९७

माजलगाव ३५९९ १७९६ ३५९५ ९९.८८

गेवराई ४४९९ २६२९ ४४९८ ९९.९७

वडवणी १५७९ १०६५ १५७९ १००.००

शिरूर १८२१ १२२७ १८२१ १००.००

आष्टी ३९४३ २५३३ ३९४३ १००.००

पाटोदा १८२३ १२७३ १८२३ १००.००

बीड ९३१७ ६४६६ ९३१५ ९९.९७

----------

६५९ शाळांचा निकाल १०० टक्के

जिल्ह्यातील ६५९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून यंदा हा आकडा विक्रमी आहे. १३ शाळांचा निकाल पेक्षा कमी आहे. नोव्हेंबरमध्ये चार महिने प्रत्यक्ष वर्ग भरले. या कालावधीत ६० टक्के अभ्यास मुलांकडून करून घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे परीक्षा न होता नववीचे ५० टक्के व दहावीचे ५० टक्के गुणांवर मूल्यमापन करण्यात आले. नववीत मिळालेल्या कमी गुणांचा फटका मात्र अनेक विद्यार्थ्यांना बसला आहे.

--------

निकालाच्या वेळीच लाईन ऑफ

कोरोनामुळे परीक्षा रद्द करून मूल्यांकन करण्यात आले. तरीही निकालाची विद्यार्थी व पालकांना उत्सुकता होती. परंतु शुक्रवारी निकाल जाहीर होताच संगणक, माेबाईलद्वारे सर्च करताना अनंत अडचणी आल्या. आधी वर्ग भरले नाही, नंतर भरले तर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे परीक्षा देता आली नाही. निकालाच्या वेळी सर्व्हर डाऊनमुळे लाईन ऑफ झाल्या. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा आनंद हिरावला.

---------

मुले का अनुत्तीर्ण झाली?

खरे तर यंदा दहावीचा निकाल १०० टक्केच लागायला हवा होता. नववीतील ५० टक्के गुण, दहावीचे अंतर्गत मूल्यमापनासह एकूण ५० गुण या आधारे झालेल्या निकालामुळे गळती होण्याचे काहीच कारण नाही; तरीही १३ मुले अनुत्तीर्ण का झाली, याचा शोध घ्यावा लागणार आहे.