शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

पोलीस-पालिकेत समन्वय नसल्याने अनधिकृत बांधकामधारकांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:18 IST

अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना मंगळवारी पत्र दिले होते. केवळ पालिका व पोलिसांचा समन्वय नसल्याने २४ तासानंतरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना मंगळवारी पत्र दिले होते. केवळ पालिका व पोलिसांचा समन्वय नसल्याने २४ तासानंतरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. चौकशीच्या नावाखाली गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे तर आपल्याला पोलिसांचा फोन आला नाही, त्यामुळे आपण फिर्याद दिली नाही, असे पालिका सांगत आहे. या दोघांचे वाद अनधिकृत बांधकामधारकांना अभय देणारे ठरू पहात आहेत.बीड शहरात सध्या पालिकेच्या दुर्लक्षामुळे सर्रासपणे अनधिकृतपणे बांधकामे केली जात आहेत. हीच बांधकामे शोधण्यासाठी नवनियूक्त मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी विशेष स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती केली. यापूर्वी रखडलेल्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे बीड शहरातील कारंजा रोड परिसरात परवानगीपेक्षा जास्त बांधकाम करणाºया सात ते आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी दोरकुळकर यांनी बीड शहर पोलिसांना पत्र दिले होते. शहर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल करू, असे पालिकेला सांगितले.तर आम्ही पत्र देण्याचे काम केले आहे. अहवाल पाहिल्यावर कॉल करू, असे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे पालिकेच्या निरीक्षकांनी सांगितले. फिर्यादी बाजू असतानाही पालिकेला निमंत्रणाची आवश्यकता का भासावी, असा सवाल उपस्थित होत आहे. या सर्व प्रकरणांत पोलीस आणि बीड पालिका कर्मचाऱ्यांचा समन्वय नसल्यानेच २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही. यामुळे अनधिकृत बांधकाम धारक सावध झाले असून, त्यांनी कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणBeed policeबीड पोलीसMuncipal Corporationनगर पालिका